शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

दुष्काळी भागातही जमिन महसूलाची वसुली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 14:50 IST

वाशिम :  संपूर्ण रिसोड तालुका तसेच मालेगाव तालुक्यातील जउळका रेल्वे आणि मानोरा तालुक्यातील उमरी या दोन महसूल मंडळात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर झालेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  संपूर्ण रिसोड तालुका तसेच मालेगाव तालुक्यातील जउळका रेल्वे आणि मानोरा तालुक्यातील उमरी या दोन महसूल मंडळात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर झालेला आहे. दुष्काळी सवलतींची अंमलबजावणी करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी संबंधित यंत्रणांना दिलेले आहेत. तथापि, दुष्काळी भागातही जमिन महसूल वसुलीचा तगादा सुरू आहे तर दुसरीकडे  दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भातही ठोस कार्यवाही नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.यावर्षी राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये तसेच महसूल मंडळांत जून ते सप्टेंबर या दरम्यान पर्जन्यमानाने सरासरी गाठली नाही. अशा दुष्काळी भागातील शेतकºयांसह नागरिकांना दिलासा म्हणून शासनाने दुष्काळी सवलती लागू केलेल्या आहेत. जिल्ह्यातील संपूर्ण रिसोड तालुका तसेच मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे आणि मानोरा तालुक्यातील उमरी या महसूल मंडळात दुष्काळी सवलतींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संबंधित यंत्रणांना दिलेले आहेत. रिसोड तालुक्यातील रिठद महसूल मंडळात महसूल विभागातर्फे शेतकºयांकडून जमिन महसूल वसूल केला जात आहे. जमिन महसूलात सूट असतानाही वसूली सुरू असल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रिठद येथील नारायणराव आरू यांना जमिन महसूल भरण्यासंदर्भात सूचना मिळाल्याने त्यांनी जमिन महसूलाचा भरणा केला आहे. दुष्काळी सवलती लागू असल्याने जमिन महसूलात सुट मिळालेली आहे. त्यामुळे शेतकºयांकडून जमिन महसूल वसूली करू नये, अशी मागणी पंचायत समिती सदस्य शारदा आरू यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दुसरीकडे परीक्षा शुल्क माफी असल्याने दुष्काळी भागातील दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क परत मिळण्याची कार्यवाहीदेखील संथगतीने सुरू असल्याचे दिसून येते. रिसोड तालुक्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा मिळून जवळपास ५७ शाळा आहेत. या शाळांमध्ये दहावी व बारावीचे जवळपास ९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, या विद्यार्थ्यांंनी परीक्षा शुल्क भरलेले आहे. तसेच जऊळका रेल्वे  व उमरी महसूल मंडळात जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनीदेखील परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. जवळपास ११ हजार विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत मिळण्यासंदर्भात आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही अद्याप पूर्णत्वाकडे आली नाही. शिक्षण विभागाने शाळांकडून विद्यार्थी संख्या, बँके खाते क्रमांक मागविले आहेत. विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक व अन्य माहिती संकलीत करण्याची कार्यवाही शाळास्तरावर सुरू असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीdroughtदुष्काळ