शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘लॉकडाऊन’मध्ये टरबूज, खरबूज, संत्र्याची विक्रमी विक्री; चार कोटींवर उलाढाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 17:51 IST

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या अभिनव उपक्रमातून झालेल्या शेतमाल विक्रीतून ९ मे पर्यंत ४ कोटींवर उलाढाल झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूच्या पृष्ठभुमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’ला ९ मे रोजी ४६ दिवस पूर्ण झाले. यादरम्यान शेतकºयांनी पपई, टरबूज, खरबूज, संत्रा या फळपिकांची व्यापाºयांमार्फत विक्री न करता स्वत:च बाजारात बसून विक्री केली. विशेष म्हणजे अकोला येथील ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये ठेवलेला मुंगळा (ता.मालेगाव) येथील संत्र्याला वाशिममध्ये चांगला दर मिळाला. यामाध्यमातून ९ मे पर्यंत ४ कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाली.वाशिम जिल्ह्यातील मुंगळा हे सर्वाधिक संत्रा आणि टरबूज पिकविणाºया शेतकºयांचे गाव म्हणून ओळखले जाते. यासह वारंगी, करंजी, डही, शिरपूर, घाटा मिर्झापूर, मेडशी या गावांमधील शेतकरीही पपई, संत्रा, टरबूज, खरबूज यासह भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेतात.दरम्यान, फळपिकांची दरवर्षी व्यापाºयांना थेट विक्री केली जाते. मिळेल तो दर घेऊन समाधान मानावे लागते. यंदा मात्र ‘लॉकडाऊन’मुळे परजिल्ह्यातून व्यापाºयांनी शेतकºयांचा शेतमाल घेण्याबाबत उदासिनता दर्शविली. यामुळे अखेर शेतकºयांनी स्वत:च आपला माल वाशिमच्या बाजारात विक्रीस उपलब्ध केला. कृषी विभागाचे त्यास अपेक्षित सहकार्य लाभल्याने शेतकºयांचा चांगला फायदा झाला. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या अभिनव उपक्रमातून झालेल्या शेतमाल विक्रीतून ९ मे पर्यंत ४ कोटींवर उलाढाल झाली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी