शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 18:29 IST

मानोरा तालुक्यातील आमकिन्ही परिसरातील नाल्याला पूर आला तर मालेगाव तालुक्यातील किन्ही घोडमोड, शिरपूर, दुधाळा परिसरातील शेती जलमय झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात २ जुलै रोजी दुपारच्या सुमारास सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस कोसळला असून, मानोरा व मालेगाव तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. मानोरा तालुक्यातील आमकिन्ही परिसरातील नाल्याला पूर आला तर मालेगाव तालुक्यातील किन्ही घोडमोड, शिरपूर, दुधाळा परिसरातील शेती जलमय झाली.मंगळवारी दुपारच्या सुमारास वाशिम शहर परिसरातही धो-धो पाऊस झाला. जिल्ह्यातील काही गावांमध्ये ओढवलेल्या पुरामुळे शेतजमिनी खरडून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. मानोरा तालुक्यात शेवटच्या टोकावर असलेल्या आमकिन्ही परिसरात २ जुलै रोजी दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील नाल्याला पूर आला. त्यामुळे काही वेळेसाठी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. तीन दिवसांपूर्वी आमकिन्ही गावानजीकच असलेल्या ज्योतिबानगर येथे वीज पडल्यामुळे बैलजोडी ठार झाली होती. मंगळवारी पावसाचा जोर अधिक असल्याने शेतकºयांसह शेतमजुरांनी शेतातून घराचा रस्ता धरला. आमकिन्ही परिसरातील नाल्याला पूर आल्याने काही वेळ वाहतूक ठप्प होती. सुरूवातीपासूनच आमकिन्ही परिसरात धो-धो पाऊस बरसत आहे तर हळदा, जगदंबानगर, कोलार, साखरडोह परिसरात शेतकºयांनी अल्पशा पावसाच्या भरवशावर पेरण्या आटोपल्या आहेत.मालेगाव तालुक्यातील किन्हीघोडमोड, वसारी, दापूरी, शिरपूर व दुधाळा परिसरातही दमदार पाऊस झाला. मालेगाव ते हिंगोली या ४६१ बी क्रमांकाच्या महामार्गाच्या कामांमध्ये शिरपूर ते दुधाळा दरम्यान श्रीराम बळी यांच्या शेताजवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे पाण्याचा प्रवाह बंद झाला. परिणामी, पावसाचे पाणी परिसरातील शेतांमध्ये घुसले. यामध्ये मालेगाव येथील श्रीराम बळी यांच्या विहिर, शेततळ्याचे व ८ एकर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाळा सुरू होऊनही संबंधित कंत्राटदाराने कामात दिरंगाई केल्याने शेतकºयांवर ही वेळ ओढवली आहे. या नुकसानाबद्दल संबंधित कंत्राटदाराविरूद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस