शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 18:29 IST

मानोरा तालुक्यातील आमकिन्ही परिसरातील नाल्याला पूर आला तर मालेगाव तालुक्यातील किन्ही घोडमोड, शिरपूर, दुधाळा परिसरातील शेती जलमय झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात २ जुलै रोजी दुपारच्या सुमारास सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस कोसळला असून, मानोरा व मालेगाव तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. मानोरा तालुक्यातील आमकिन्ही परिसरातील नाल्याला पूर आला तर मालेगाव तालुक्यातील किन्ही घोडमोड, शिरपूर, दुधाळा परिसरातील शेती जलमय झाली.मंगळवारी दुपारच्या सुमारास वाशिम शहर परिसरातही धो-धो पाऊस झाला. जिल्ह्यातील काही गावांमध्ये ओढवलेल्या पुरामुळे शेतजमिनी खरडून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. मानोरा तालुक्यात शेवटच्या टोकावर असलेल्या आमकिन्ही परिसरात २ जुलै रोजी दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील नाल्याला पूर आला. त्यामुळे काही वेळेसाठी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. तीन दिवसांपूर्वी आमकिन्ही गावानजीकच असलेल्या ज्योतिबानगर येथे वीज पडल्यामुळे बैलजोडी ठार झाली होती. मंगळवारी पावसाचा जोर अधिक असल्याने शेतकºयांसह शेतमजुरांनी शेतातून घराचा रस्ता धरला. आमकिन्ही परिसरातील नाल्याला पूर आल्याने काही वेळ वाहतूक ठप्प होती. सुरूवातीपासूनच आमकिन्ही परिसरात धो-धो पाऊस बरसत आहे तर हळदा, जगदंबानगर, कोलार, साखरडोह परिसरात शेतकºयांनी अल्पशा पावसाच्या भरवशावर पेरण्या आटोपल्या आहेत.मालेगाव तालुक्यातील किन्हीघोडमोड, वसारी, दापूरी, शिरपूर व दुधाळा परिसरातही दमदार पाऊस झाला. मालेगाव ते हिंगोली या ४६१ बी क्रमांकाच्या महामार्गाच्या कामांमध्ये शिरपूर ते दुधाळा दरम्यान श्रीराम बळी यांच्या शेताजवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे पाण्याचा प्रवाह बंद झाला. परिणामी, पावसाचे पाणी परिसरातील शेतांमध्ये घुसले. यामध्ये मालेगाव येथील श्रीराम बळी यांच्या विहिर, शेततळ्याचे व ८ एकर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाळा सुरू होऊनही संबंधित कंत्राटदाराने कामात दिरंगाई केल्याने शेतकºयांवर ही वेळ ओढवली आहे. या नुकसानाबद्दल संबंधित कंत्राटदाराविरूद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस