शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

स्वच्छ सर्वेक्षणासाठी शाळा, महाविद्यालयांत जनजागृती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 2:14 PM

जिल्हा स्वच्छता कक्षातर्फे ग्रामीण भागातील नागरिक तसेच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये या मोहिमेची जनजागृती केली जात आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण मोहिम जिल्हयात राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील १० ते १६ ग्रामपंचायतींची निवड ऐच्छिक पद्धतीने करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण मोहिम वाशिम जिल्हयात राबविण्यात येत आहे. जिल्हा स्वच्छता कक्षातर्फे ग्रामीण भागातील नागरिक तसेच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये या मोहिमेची जनजागृती केली जात आहे.भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छतेबाबत गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानांकाच्या आधारे देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे. स्वच्छतेसंदर्भातील घटकांबाबत सदर सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यासाठी गुणांकन पद्धती केंद्र शासनाकडून निश्चित करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतच्या घटकांचा समावेश करण्यात आला असून सर्वात जास्त गुण मिळवणाºया जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरून २  आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील १० ते १६ ग्रामपंचायतींची निवड ऐच्छिक पद्धतीने करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र,  प्रार्थना स्थळे, यात्रास्थळे, बाजारतळ अशा विविध सार्वजनिक ठिकाणांची तपासणी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये करण्यात येणार आहे. तसेच ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-२०१८’ (एसएसजी-१८) या अ‍ॅपवर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) संदर्भात प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत. या प्रतिक्रियांची केंद्र सरकार स्तरावर घेतल्या जाणार आहे. त्यासाठी जिल्हयातील सर्व कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी, आदींनी या अ‍ॅपवर प्रतिक्रिया नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना , जिल्हा स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान