यावर्षी झालेल्या जास्त पावसामुळे जागोजागी पाण्याची डबकी साचलेली आहेत. शहरामध्ये सर्वत्र चिखल झालेला आहे, नाल्यांची वेळेवर साफसफाई होत नसल्यामुळे, घाण कचरा उचलला जात नसल्यामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने रुग्णांचे प्रमाण वाढलेले आहे. शहरामध्ये डासांना नष्ट करणाऱ्या औषधासह धूर फवारणी करण्याची मागणी होत आहे. तसेच बऱ्याच वाॅर्डामध्ये रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला चिखल झालेला आहे. त्या त्या ठिकाणी तात्काळ मुरूम टाकण्यात यावा, शहरातील कित्येक विद्युत खांबांवरील दिवे गेलेले आहेत. यांसह विविध समस्या आहेत.
निवेदनावर मालेगाव शहर अध्यक्ष जावेदखान पठाण, तालुका महासचिव शेख कदिरभाई, युवक आघाडीचे अजीम चौधरी, फय्याज शाह, ॲड. के. एन. साळुंके, देवानंद कांबळे, कांचनबाई कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.