शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मान्सून लांबणीवर: कृषीसेवा केंद्रांवर शुकशुकाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 17:27 IST

वाशिम: मान्सून रेंगाळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, बियाणे, खतांच्या खरेदीवर त्याचा परिणाम झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मान्सून रेंगाळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, बियाणे, खतांच्या खरेदीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील कृषीसेवा केंद्रांवर शुकशुकाट पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकºयांनी पेरणीसाठी जमिन सज्ज ठेवली आहे. दुसरीकडे यावर्षीदेखील बहुतांश शेतकºयांची सोयाबीन पेरणीला पसंती राहिल, असा अंदाज गृहित धरून कृषी विभागाने जिल्ह्यातील चार लाख १५ हजार हेक्टवर पेरणीचे नियोजन केले आहे. शेतातील काडीकचरा वेचणे, वखरणी आदी कामे पूर्ण केली असून पेरणीसाठी शेतकºयांनी जमिन सज्ज ठेवली आहे. यावर्षीदेखील बहुतांश शेतकरी सोयाबीनची पेरणी करतील, असा अंदाज कृषी विभागाला आहे. त्या दृष्टिने खरिप हंगामातील पेरणीचे नियोजन केले असून, एकूण चार लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज बांधण्यात आला आहे. यापैकी २ लाख ९० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होईल, असे कृषी विभागाने गृहित धरले आहे. ६० हजार हेक्टरवर तूर, २५ हजार हेक्टरवर कपाशी, १५ हजार हेक्टरवर मुग व २० हजार हेक्टरवर उडीद या प्रमुख पिकांच्या पेरणीचा अंदाज आहे. मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाल्यानंतर आणि त्यानंतर संभाव्य पावसाचा अंदाज पाहून शेतकºयांनी पेरणीला सुरूवात करावी. हवामान खात्याचा अंदाज तसेच कृषी विभागाच्या सल्ल्याने शेतकºयांनी पेरणी करावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याने शेतकºयांच्या चेहºयावर चिंतेचे ढग पसरू लागले आहेत. त्यामुळे त्यांनी बियाणे, खतांसह इतर कृषी निविष्ठांची खरेदी स्थगित केली आहे. परिणामी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर शुकशुकाट पसरल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी