शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

मान्सून लांबणीवर: कृषीसेवा केंद्रांवर शुकशुकाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 17:27 IST

वाशिम: मान्सून रेंगाळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, बियाणे, खतांच्या खरेदीवर त्याचा परिणाम झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मान्सून रेंगाळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, बियाणे, खतांच्या खरेदीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील कृषीसेवा केंद्रांवर शुकशुकाट पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकºयांनी पेरणीसाठी जमिन सज्ज ठेवली आहे. दुसरीकडे यावर्षीदेखील बहुतांश शेतकºयांची सोयाबीन पेरणीला पसंती राहिल, असा अंदाज गृहित धरून कृषी विभागाने जिल्ह्यातील चार लाख १५ हजार हेक्टवर पेरणीचे नियोजन केले आहे. शेतातील काडीकचरा वेचणे, वखरणी आदी कामे पूर्ण केली असून पेरणीसाठी शेतकºयांनी जमिन सज्ज ठेवली आहे. यावर्षीदेखील बहुतांश शेतकरी सोयाबीनची पेरणी करतील, असा अंदाज कृषी विभागाला आहे. त्या दृष्टिने खरिप हंगामातील पेरणीचे नियोजन केले असून, एकूण चार लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज बांधण्यात आला आहे. यापैकी २ लाख ९० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होईल, असे कृषी विभागाने गृहित धरले आहे. ६० हजार हेक्टरवर तूर, २५ हजार हेक्टरवर कपाशी, १५ हजार हेक्टरवर मुग व २० हजार हेक्टरवर उडीद या प्रमुख पिकांच्या पेरणीचा अंदाज आहे. मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाल्यानंतर आणि त्यानंतर संभाव्य पावसाचा अंदाज पाहून शेतकºयांनी पेरणीला सुरूवात करावी. हवामान खात्याचा अंदाज तसेच कृषी विभागाच्या सल्ल्याने शेतकºयांनी पेरणी करावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याने शेतकºयांच्या चेहºयावर चिंतेचे ढग पसरू लागले आहेत. त्यामुळे त्यांनी बियाणे, खतांसह इतर कृषी निविष्ठांची खरेदी स्थगित केली आहे. परिणामी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर शुकशुकाट पसरल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी