शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

साडेतीन एकरात ६५ क्विंटल ज्वारीचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 16:00 IST

ही किमया मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा येथील शेतकरी नारायण ठाकरे यांनी केली आहे. 

- ओम वलोकार

कोठारी (वाशिम) : गुरांना चारा व्हावा उपलब्ध व्हावा आणि उत्पन्नही घेता यावे, या उद्देशाने रब्बी हंगामात अवघ्या साडे तीन एकर क्षेत्रात पेरलेल्या ज्वारीतून ६५ क्विंटलचे उत्पन्न झाले. ही किमया मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा येथील शेतकरी नारायण ठाकरे यांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र आता नावालाच उरले आहे; परंतु खरीप हंगामात पावसाळ्याच्या सुरुवातीची अनियमितता आणि नंतर अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मुग, उडीद आदि पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उत्पन्न काही झाले नाहीच शिवाय गुरांसाठी चाराही राहिला नाही. त्यामुळे पशूपालक शेतकरी अडचणीत सापडले होते. बोरव्हा येथील शेतकरी नारायणठाकरे यांच्यापुढेही हीच समस्या होती. त्यावर उपाय म्हणून त्यांनी रब्बी हंगामात ज्वारी पेरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आपल्या एकूण शेतीपैकी केवळ साडे तीन एकर क्षेत्रात रब्बी ज्वारीची पेरणी केली. इतर पिकांच्या तुलनेत ज्वारीसाठी पोषक वातावरण असतानाच त्यांनी या पिकाचे योग्य व्यवस्थापन केले. शिवाय रखवाली करून वन्यप्राण्यांपासून हे पीक वाचविले. या पिकातून साधारण ३५ ते ४० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा त्यांना होती; परंतु त्यांच्या योग्य व्यवस्थापनामुळे एवढ्याच क्षेत्रात एकरी १९ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन झाले असून, साडे तीन एकरात मिळून त्यांना ६५ क्विंटल ज्वारीचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे गुरांच्या चाºयाची समस्याही मिटली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी