शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

आता खासगी शाळांतील तक्रारींचे विभागीयस्तरावरून निवारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:53 IST

या समितीच्या माध्यमातून राज्यभरातील सर्व शाळांतील तक्रारींचे निवारण केले जाणार आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: राज्यातील खासगी अनुदानित, विना अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतरांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थानिक पातळीवर संस्थाध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ञांच्या समित्या असतानाही तक्रारींची संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने २६ फेब्रुवारीच्या निर्णयान्वये सर्व विभागस्तरावर माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून राज्यभरातील सर्व शाळांतील तक्रारींचे निवारण केले जाणार आहे.महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियम अधिनियम १९७७ मधील कलम ८ अन्वये शाळा न्यायाधिकरणाची तरतूद असून, शाळा न्यायाधिकरणाच्या अधिकारक्षेत्रात न येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी सद्यस्थितीत कोणतीही औपचारिक व्यवस्था अस्तित्वात नाही. खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांतील शिक्षक, शिक्षकेतरांच्या तक्र्रारींवर कार्यवाहीची व्यवस्था नसल्याने न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत होती. या अनुषंगाने दाखल याचिकांबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १८ डिसेंबर २०१८ च्या निर्णयान्वये शिक्षक, शिक्षकेतरांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी समित्याही गठीत केल्या. याच धर्तीवर शासनाच्या २९ आॅगस्ट २०१९च्या निर्णयान्वये आणि १ आॅक्टोबर २०१९ च्या शुद्धीपत्रकान्वये संबंधित संस्थेचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षणतज्ज्ञ व संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांचा समावेश असलेल्या तक्र ार निवारण समित्या गठीत केल्या. त्यानंतरही विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा व संस्था यांच्याकडील तक्रारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. ही गंभीर बाब असल्याने शासनाने आता अशा तक्रारींचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक विभागस्तरावर समितीची नियुक्ती केली आहे. या समितीत सदस्य म्हणून संबंधित विभागाचे शिक्षण उपसंचालक, शिक्षण उपनिरीक्षक, सहाय्यक संचालकांचा समावेश आहे. तालुकास्तरावरील शिक्षण विस्तार अधिकारी त्यांच्याकडे प्राप्त तक्रारीची पडताळणी करून ती शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवतील. त्यानंतर शिक्षणाधिकारी स्वत:ही त्या तक्रारीची पडताळणी करून ती विभागीय समितीकडे पाठवतील. त्यानंतर विभागीयस्तरावर या समितीकडून तक्रारीची चौकशी आणि सुनावणी करून निर्णय देणार आहे. या समितीच्या निकालाबाबत तक्रारदार समाधानी नसल्यास त्यांना न्यायालयात जाण्याचा मार्गही मोकळा असणार आहे.----------------कोट: पूर्वी अस्तिवात असलेल्या तक्रार निवारण समित्यांत कोणत्याही शासकीय अधिकाºयाचा समावेश नव्हता. संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांचा समावेश असलेल्या तक्रारी विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे जात होत्या. आता शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षण उपसंचालकांसह शिक्षण उपनिरीक्षक, सहाय्यक संचालकांचा समावेश असलेल्या तक्रार निवारण समितीमार्फतच तक्रारींचे निवारण होणार आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे.-गजाननराव डाबेराव,प्रभारी उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा