शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

आढावा बैठकीस प्राचार्य अनुपस्थित; २४ महाविद्यालयांना ‘शो-काॅज’!

By सुनील काकडे | Updated: July 10, 2024 15:54 IST

खुलासा सादर करण्याचे निर्देश : तीन दिवसांचा ‘अल्टीमेटम’

सुनील काकडे, वाशिम : जिल्ह्यातील महाविद्यालयांनी इयत्ता ११वीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश करू नये. तसेच ११वी नंतर अन्य महाविद्यालयांतील कुठल्याच विद्यार्थ्यांस इयत्ता १२वीत परस्पर प्रवेश देवू नये, अशी स्पष्ट सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी ९ जुलै रोजी बैठक घेण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील २४ विद्यालयांतील मुख्याध्यापक, प्राचार्य अनुपस्थित राहिले. त्यांच्या नावे त्याचक्षणी कारणे दाखवा नोटीस काढून तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ११वीत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी १२वीसाठी ग्रामिण भागातील महाविद्यालयांकडे धाव घेत आहेत. हा प्रकार चुकीचा असून त्यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षणाधिकारी कार्यालयाची रितसर पुर्वपरवानगी घेतल्याशिवाय परस्पर प्रवेश देवू नये. विद्यार्थ्याच्या मूळ कनिष्ठ महाविद्यालयास इयत्ता ११वी उत्तीर्ण झाल्याचा दाखला देण्याकरिता पत्र देवू नये. पूर्वपरवानगीशिवाय १२वीत परस्पर प्रवेश दिल्यास असे प्रवेश रद्द करण्यात येतील, असे स्पष्ट निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते.दरम्यान, ६ जुलै रोजी इयत्ता ११वीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. तोपर्यंत झालेले प्रवेश आणि इयत्ता १२वीत नव्याने झालेल्या प्रवेशाचा आढावा घेण्याकरिता ९ जुलै रोजी बैठक घेण्यात आली. मात्र, २४ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य अनुपस्थित राहिले. यामुळे संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. काय नमूद आहे नोटीसमध्ये?इयत्ता ११वी आणि १२वीच्या प्रवेशासंबंधीचा आढावा घेण्याकरिता ९ जुलै रोजी आयोजित बैठकीसंबंधी वेळोवेळी कळवूनही मुख्याध्यापक, प्राचार्य अनुपस्थित राहिले. वरिष्ठांची सूचना आणि शासकीय धोरणांचे पालन न केल्याप्रकरणी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता काढून घेण्याची कार्यवाही का करण्यात येवू नये, असे नोटीसमध्ये नमूद आहे. तीन दिवसांत समाधानकारक खुलासा सादर न केल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनी नोटीसद्वारे संबंधितांना कळविले आहे.

टॅग्स :washimवाशिम