शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आढावा बैठकीस प्राचार्य अनुपस्थित; २४ महाविद्यालयांना ‘शो-काॅज’!

By सुनील काकडे | Updated: July 10, 2024 15:54 IST

खुलासा सादर करण्याचे निर्देश : तीन दिवसांचा ‘अल्टीमेटम’

सुनील काकडे, वाशिम : जिल्ह्यातील महाविद्यालयांनी इयत्ता ११वीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश करू नये. तसेच ११वी नंतर अन्य महाविद्यालयांतील कुठल्याच विद्यार्थ्यांस इयत्ता १२वीत परस्पर प्रवेश देवू नये, अशी स्पष्ट सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी ९ जुलै रोजी बैठक घेण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील २४ विद्यालयांतील मुख्याध्यापक, प्राचार्य अनुपस्थित राहिले. त्यांच्या नावे त्याचक्षणी कारणे दाखवा नोटीस काढून तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ११वीत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी १२वीसाठी ग्रामिण भागातील महाविद्यालयांकडे धाव घेत आहेत. हा प्रकार चुकीचा असून त्यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षणाधिकारी कार्यालयाची रितसर पुर्वपरवानगी घेतल्याशिवाय परस्पर प्रवेश देवू नये. विद्यार्थ्याच्या मूळ कनिष्ठ महाविद्यालयास इयत्ता ११वी उत्तीर्ण झाल्याचा दाखला देण्याकरिता पत्र देवू नये. पूर्वपरवानगीशिवाय १२वीत परस्पर प्रवेश दिल्यास असे प्रवेश रद्द करण्यात येतील, असे स्पष्ट निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते.दरम्यान, ६ जुलै रोजी इयत्ता ११वीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. तोपर्यंत झालेले प्रवेश आणि इयत्ता १२वीत नव्याने झालेल्या प्रवेशाचा आढावा घेण्याकरिता ९ जुलै रोजी बैठक घेण्यात आली. मात्र, २४ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य अनुपस्थित राहिले. यामुळे संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. काय नमूद आहे नोटीसमध्ये?इयत्ता ११वी आणि १२वीच्या प्रवेशासंबंधीचा आढावा घेण्याकरिता ९ जुलै रोजी आयोजित बैठकीसंबंधी वेळोवेळी कळवूनही मुख्याध्यापक, प्राचार्य अनुपस्थित राहिले. वरिष्ठांची सूचना आणि शासकीय धोरणांचे पालन न केल्याप्रकरणी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता काढून घेण्याची कार्यवाही का करण्यात येवू नये, असे नोटीसमध्ये नमूद आहे. तीन दिवसांत समाधानकारक खुलासा सादर न केल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनी नोटीसद्वारे संबंधितांना कळविले आहे.

टॅग्स :washimवाशिम