शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

‘वॉटर न्यूट्रल’ ठरलेल्या १०० गावात संभाव्य पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:13 IST

१०० गावांत संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कृती आराखड्यातून उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जलयुक्त शिवार अभियानातर्गंत गत चार वर्षात जिल्हयातील जवळपास ६०० गावे वॉटर न्यूट्रल (जलपरिपूर्ण) ठरलेली आहे. यापैकी १०० गावांत संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कृती आराखड्यातून उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यात गत चार वर्षात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झालेल्या गावांत नाला रुंदीकरण, सरळीकरण, खोलीकरण, नाला बांधाचे खोलीकरण, कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसेच पाणी वापर संस्थाचे बळकटीकरण आदी कामे पूर्ण केली जातात.सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० आणि सन २०१८-१९ या वर्षात २५२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. जलसंधारणाची विविध कामे करण्यात आल्याने यामधील ६०० गावांची पाण्याची गरज पूर्ण झाल्याचे दाखवून या गावांचा समावेश ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये करण्यात आला. पाण्याची गरज भागेपर्यंत कमतरता नाही आणि अतिरिक्त पण नाही, अशा गावांना ‘वॉटर न्यूट्रल’ (जलपरिपूर्ण) म्हटले जाते. वॉटर न्यूट्रल ठरलेल्या १०० गावांत संभाव्य पाणीटंचाई जाणवणार असल्याने तेथे विहिर अधिग्रहण, टँकर, हातपंप आदी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० आणि सन २०१८-१९ या वर्षात २५२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. त्या गावाला पाण्याची नेमकी गरज किती आहे, तेथे गरजेऐवढे पाणी उपलब्ध असेल तर त्या गावाचा समावेश वॉटर न्यूट्रलच्या यादीत केला जातो. जिल्ह्यात ६०० च्या जवळपास गावे वॉटर न्यूट्रल आहेत. उन्हाळ्यात जेथे कुठे पाणीटंचाई निर्माण होईल, तेथे उपाययोजना राबविताना ‘वॉटर न्यूट्रल’ यादीची अडचण भासणार नाही. यापुढेही अन्य योजनांमधून जलसंधारणाची कामे होतील. - एस.एम. तोटावरजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीख वाशिम

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई