शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर न्यूट्रल’ ठरलेल्या १०० गावात संभाव्य पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:13 IST

१०० गावांत संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कृती आराखड्यातून उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जलयुक्त शिवार अभियानातर्गंत गत चार वर्षात जिल्हयातील जवळपास ६०० गावे वॉटर न्यूट्रल (जलपरिपूर्ण) ठरलेली आहे. यापैकी १०० गावांत संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कृती आराखड्यातून उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यात गत चार वर्षात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झालेल्या गावांत नाला रुंदीकरण, सरळीकरण, खोलीकरण, नाला बांधाचे खोलीकरण, कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसेच पाणी वापर संस्थाचे बळकटीकरण आदी कामे पूर्ण केली जातात.सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० आणि सन २०१८-१९ या वर्षात २५२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. जलसंधारणाची विविध कामे करण्यात आल्याने यामधील ६०० गावांची पाण्याची गरज पूर्ण झाल्याचे दाखवून या गावांचा समावेश ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये करण्यात आला. पाण्याची गरज भागेपर्यंत कमतरता नाही आणि अतिरिक्त पण नाही, अशा गावांना ‘वॉटर न्यूट्रल’ (जलपरिपूर्ण) म्हटले जाते. वॉटर न्यूट्रल ठरलेल्या १०० गावांत संभाव्य पाणीटंचाई जाणवणार असल्याने तेथे विहिर अधिग्रहण, टँकर, हातपंप आदी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० आणि सन २०१८-१९ या वर्षात २५२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. त्या गावाला पाण्याची नेमकी गरज किती आहे, तेथे गरजेऐवढे पाणी उपलब्ध असेल तर त्या गावाचा समावेश वॉटर न्यूट्रलच्या यादीत केला जातो. जिल्ह्यात ६०० च्या जवळपास गावे वॉटर न्यूट्रल आहेत. उन्हाळ्यात जेथे कुठे पाणीटंचाई निर्माण होईल, तेथे उपाययोजना राबविताना ‘वॉटर न्यूट्रल’ यादीची अडचण भासणार नाही. यापुढेही अन्य योजनांमधून जलसंधारणाची कामे होतील. - एस.एम. तोटावरजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीख वाशिम

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई