शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘वॉटर न्यूट्रल’ ठरलेल्या १०० गावात संभाव्य पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:13 IST

१०० गावांत संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कृती आराखड्यातून उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जलयुक्त शिवार अभियानातर्गंत गत चार वर्षात जिल्हयातील जवळपास ६०० गावे वॉटर न्यूट्रल (जलपरिपूर्ण) ठरलेली आहे. यापैकी १०० गावांत संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कृती आराखड्यातून उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यात गत चार वर्षात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झालेल्या गावांत नाला रुंदीकरण, सरळीकरण, खोलीकरण, नाला बांधाचे खोलीकरण, कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसेच पाणी वापर संस्थाचे बळकटीकरण आदी कामे पूर्ण केली जातात.सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० आणि सन २०१८-१९ या वर्षात २५२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. जलसंधारणाची विविध कामे करण्यात आल्याने यामधील ६०० गावांची पाण्याची गरज पूर्ण झाल्याचे दाखवून या गावांचा समावेश ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये करण्यात आला. पाण्याची गरज भागेपर्यंत कमतरता नाही आणि अतिरिक्त पण नाही, अशा गावांना ‘वॉटर न्यूट्रल’ (जलपरिपूर्ण) म्हटले जाते. वॉटर न्यूट्रल ठरलेल्या १०० गावांत संभाव्य पाणीटंचाई जाणवणार असल्याने तेथे विहिर अधिग्रहण, टँकर, हातपंप आदी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० आणि सन २०१८-१९ या वर्षात २५२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. त्या गावाला पाण्याची नेमकी गरज किती आहे, तेथे गरजेऐवढे पाणी उपलब्ध असेल तर त्या गावाचा समावेश वॉटर न्यूट्रलच्या यादीत केला जातो. जिल्ह्यात ६०० च्या जवळपास गावे वॉटर न्यूट्रल आहेत. उन्हाळ्यात जेथे कुठे पाणीटंचाई निर्माण होईल, तेथे उपाययोजना राबविताना ‘वॉटर न्यूट्रल’ यादीची अडचण भासणार नाही. यापुढेही अन्य योजनांमधून जलसंधारणाची कामे होतील. - एस.एम. तोटावरजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीख वाशिम

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई