शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

कारवाई करणारे पोलीसच मास्क वापराबाबत उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:56 IST

राज्यात गत महिन्यापर्यंत नियंत्रणात असलेला कोरोना विषाणू संसर्ग आता पुन्हा झपाट्याने वाढू लागला आहे. वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अमरावती, ...

राज्यात गत महिन्यापर्यंत नियंत्रणात असलेला कोरोना विषाणू संसर्ग आता पुन्हा झपाट्याने वाढू लागला आहे. वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत असताना, वाशिम जिल्ह्यातही गेल्या आठवडाभरात अर्थात १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारीदरम्यानच्या काळात १८२ लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शण्मुगराजन यांनी कोरोना संदर्भातील नवे नियम जारी केले आहेत. त्यात सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीसह मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह पोलीस प्रशासनालाही या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याची अंमलबजावणीही पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून केली जात आहे. तथापि, काही पोलीस मात्र स्वत:च मास्क वापराबाबत उदासीन आहेत. शुक्रवारी वाशिम शहरात हे चित्र पाहायला मिळेल.

---------------

जनतेवर प्रभाव पडणार काय

जिल्ह्यात कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना प्रशासनाला देत आहेत. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून होण्यासाठी त्यांनी प्रथम स्वत:च अमलबजावणी करून जनतेसमोर आदर्श ठेवायला हवा, परंतु प्रशासकीय यंत्रणाच आदेशाचे पालन करीत नसेल, तर जनतेवर प्रभाव पडणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.