शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

फवारणीतून ५७ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 11:41 IST

जिल्ह्यात यंदा आजवर ५७ जणांना फवारणीतून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभागाच्यावतीने कीटकनाशक फवारणीतून शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होऊ नये, यासाठी गावागावांत मार्गदर्शन कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यानंतरही जिल्ह्यात यंदा आजवर ५७ जणांना फवारणीतून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला. तथापि, वेळीच उपचार घेतल्याने सर्वांची प्रकृती सुधारली.गेल्या तीन, चार वर्षांपासून शेतकरी, शेतमजुरांना कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होण्याच्या घटना घडत आहेतं. यात दोन वर्षांपूर्वी या प्रकारांतून काही शेतमजुरांचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर कृषी विभागाने राज्यभरात कीटकनाशक फवारणीबाबत शेतकऱ्यांना मागदर्शन करण्याची मोहिम सुरू केली. त्याचा बराच फायदाही झाला; परंतु कृषी विभागाच्या प्रयत्नानंतरही यंदा वाशिम जिल्ह्यात १ एप्रिल ते २९ आॅगस्टदरम्यानच्या कालावधित ५७ जणांना कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याचे प्रकार घडले आहेत.जिल्हा शल्य चिकित्सकांनी या संदर्भात कृषी विभागाला माहितीही दिली असून. कीटकनाशक विषबाधा झालेल्या शेतकरी, शेतमजुरांवर वेळीच उपचार करण्यात आल्यामुळे त्यांची प्रकृती सुधारली आणि आजवरच्या सर्वच बाधित रुग्णांना घरीही सोडण्यात आले. गावागावांत कृ षी विभागाकडून फवारणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शेतीशाळांचे आयोजन केले जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक वेगवेगळ्या ठिकाणी शेताच्या बांधावर या कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत. या सर्व प्रयत्नानंतरही जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून होणारे विषबाधेचे प्रकार घडत आहेत. ही बाब निश्चितच चिंताजनक असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे. विषबाधेचे परिणाम गंभीरकीटकनाशक फवारणीतून होणाºया विषाबाधेतून संबंधित व्यक्ती वाचल्यानंतरही त्याच्या शरीरावर कीटकनाशक औषधीमुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यात डोळ्यांवर, मेंदूवर परिणाम होऊन अर्धांगवायू, मुत्रपिंड निकामी होऊ शकतात.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी