शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

मासेमारीसाठी चिरकुटा प्रकल्पाच्या सभोवताल टाकले विषारी औषध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 17:34 IST

मानोरा : तालुक्यातील २८ गावांना दिग्रस (जि.यवतमाळ) तालुक्यातील चिरकुटा प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जातो; मात्र मासेमारी करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाच्या सभोवताल काही इसमांनी चक्क विषारी औषध टाकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील २८ गावांना दिग्रस (जि.यवतमाळ) तालुक्यातील चिरकुटा प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जातो; मात्र मासेमारी करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाच्या सभोवताल काही इसमांनी चक्क विषारी औषध टाकले आहे. यामुळे पाणी प्यावे लागणाºया नागरिकांचा जीव धोक्यात सापडला असून खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सर्वच गावांचा पाणीपुरवठा बंद करून या गंभीर प्रकाराची चौकशी हाती घेतली आहे.मानोरा शहरासह तालुक्यातील २८ गावांना चिरकुटा प्रकल्पावरून पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. दरम्यान, प्रकल्पाच्या सभोवताल तसेच जलशुद्धीकरण केंद्राजवळही काही इसम विषारी औषध टाकून मासेमारी करित असल्याचा प्रकार घडत आहे. ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने खबरदारी म्हणून तातडीने  पुढील आदेशापर्यंत पाणी पुरवठा बंद केला आहे. अरुणावती प्रकल्पावर मासेमारी करण्याच्या ठेका सन २०२१ पर्यंत मे ब्रिज फिशरीज, दिग्रस या कंपनीला देण्यात आला असून पाण्यात विषारी द्रव्य टाकून मासेमारी होत असल्याची तक्रार कंपनीकडून अरुणावती पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता व पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली. यासंदर्भात संबंधित प्रशासकीय यंत्रणा दोषींविरूद्ध काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराDamधरणYavatmalयवतमाळ