शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वटपौर्णिमेनिमित्त बहुगुणी वटवृक्षांचे रोपण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 15:46 IST

वाशिम - ‘वटपौर्णिमा’ हा सण नावाप्रमाणेच वटवृक्षाशी निगडीत आहे. वडाचे झाड हे हवा प्रदुषण नियंत्रणाबरोबरच ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे कामही उत्तमरितीने करीत असून, वटपौर्णिमेनिमित्त बहुगुणी अशा वटवृक्षांचे रोपण करण्याचा उपक्रम स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलतर्फे यावर्षीही राबविला जाणार आहे.

ठळक मुद्दे विकास कामांसाठी पूर्वीच्याकाळी लावण्यात आलेल्या वडांच्या झाडांची तोड करण्यात आलेली आहे. वडांच्या झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे आवाहन राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी व ईको क्लबच्या चिमुकल्यांनी केले.

  वाशिम - ‘वटपौर्णिमा’ हा सण नावाप्रमाणेच वटवृक्षाशी निगडीत आहे. वडाचे झाड हे हवा प्रदुषण नियंत्रणाबरोबरच ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे कामही उत्तमरितीने करीत असून, वटपौर्णिमेनिमित्त बहुगुणी अशा वटवृक्षांचे रोपण करण्याचा उपक्रम स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलतर्फे यावर्षीही राबविला जाणार आहे. जनजागृतीचा एक भाग म्हणून २६ जून रोजी एसएमसी इंग्लिश स्कूल परिसरात वटवृक्षांचे रोपण करण्यात आले.वडाच्या झाडाला वर्षभर पिकलेली फळे येत असल्यामुळे बºयाच प्राण्यांना व पक्ष्यांना अन्न मिळते. फळे खाण्यासाठी शेकडो पक्षी वटवृक्षावर जणू तुटुनच पडतात. तसेच बरेच प्राणी व पक्षी वडाच्या झाडाचा निवा-यासाठी उपयोग करतात. वटवृक्ष हा एक संपूर्ण परिसंस्थेचे उदाहरण आहे. या वृक्षाला फुटणाºया परिसंस्था त्यांचे स्वतंत्र वृक्षात रुपांतर होउन त्याला मिळणारे दीघार्युष्य या गुणधर्मामुळे त्याला ‘अक्षय वृक्ष’ असेही म्हटले जाते. आजच्या काळात ब-याच विकास कामांसाठी पूर्वीच्याकाळी लावण्यात आलेल्या वडांच्या झाडांची तोड करण्यात आलेली आहे. वडाचे झाड हळूहळू वाढते. आजच्या गतिमान जगामध्ये बहुतेकजण लागवडीसाठी जलद वाढणा-या व शोभीवंत वृक्ष प्रजातीची निवड करतात. त्यामुळे पुरातन काळात जतन करण्यात आलेल्या या वृक्षांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते. आपल्या पुर्वजांनी वडाच्या झाडाचे महत्व ओळखुन संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेच्या निमित्याने वटपूजा करण्याची प्रथा रूढ केली. पुर्वीच्याकाळी स्त्रिया वडाच्या झाडाच्या ठिकाणी जावून वटपूजा करीत असत. तथापि आता वडांच्या झाडांची संख्या कमी झाल्याने वडाच्या फांद्या घरी आणून त्याची पूजा करण्याची पद्धत रुढ होत आहे. ही बाब वटपौर्णिमा साजरी करण्याच्या मुळ उद्देशासाठी पूर्णत: विसंगत असुन त्यामुळे उलट वडांच्या झाडांची बेसुमार छाटनी होते. या अनिष्ठ प्रथेला आळा घालण्यासाठी एसएमसी इंग्लिश स्कूलच्या शाळेच्या प्राचार्य मीना उबगडे यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शिक्षिका प्रतीक्षा कान्हेड,  भाग्यश्री ठोके, स्नेहल राऊत, राधिका बेदरकर, वर्षा पाटील तसेच राष्ट्रीय हरीतसेनेच्या विद्यार्थींच्या हस्ते वटपौर्णिमेला वटवृक्षारोपण केले जाते. जनजागृती म्हणून २६ जून रोजीदेखील वटवृक्षारोपण करण्यात आले तसेच या वटपौर्णिमेला पर्यावरण्याच्या दृष्टिने वडाला असलेले महत्व लक्षात घेउन वडाच्या फांद्या न तोडता वडांच्या झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे आवाहन राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी व ईको क्लबच्या चिमुकल्यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन व संचालन राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत जोशी यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी