शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

वटपौर्णिमेनिमित्त बहुगुणी वटवृक्षांचे रोपण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 15:46 IST

वाशिम - ‘वटपौर्णिमा’ हा सण नावाप्रमाणेच वटवृक्षाशी निगडीत आहे. वडाचे झाड हे हवा प्रदुषण नियंत्रणाबरोबरच ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे कामही उत्तमरितीने करीत असून, वटपौर्णिमेनिमित्त बहुगुणी अशा वटवृक्षांचे रोपण करण्याचा उपक्रम स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलतर्फे यावर्षीही राबविला जाणार आहे.

ठळक मुद्दे विकास कामांसाठी पूर्वीच्याकाळी लावण्यात आलेल्या वडांच्या झाडांची तोड करण्यात आलेली आहे. वडांच्या झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे आवाहन राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी व ईको क्लबच्या चिमुकल्यांनी केले.

  वाशिम - ‘वटपौर्णिमा’ हा सण नावाप्रमाणेच वटवृक्षाशी निगडीत आहे. वडाचे झाड हे हवा प्रदुषण नियंत्रणाबरोबरच ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे कामही उत्तमरितीने करीत असून, वटपौर्णिमेनिमित्त बहुगुणी अशा वटवृक्षांचे रोपण करण्याचा उपक्रम स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलतर्फे यावर्षीही राबविला जाणार आहे. जनजागृतीचा एक भाग म्हणून २६ जून रोजी एसएमसी इंग्लिश स्कूल परिसरात वटवृक्षांचे रोपण करण्यात आले.वडाच्या झाडाला वर्षभर पिकलेली फळे येत असल्यामुळे बºयाच प्राण्यांना व पक्ष्यांना अन्न मिळते. फळे खाण्यासाठी शेकडो पक्षी वटवृक्षावर जणू तुटुनच पडतात. तसेच बरेच प्राणी व पक्षी वडाच्या झाडाचा निवा-यासाठी उपयोग करतात. वटवृक्ष हा एक संपूर्ण परिसंस्थेचे उदाहरण आहे. या वृक्षाला फुटणाºया परिसंस्था त्यांचे स्वतंत्र वृक्षात रुपांतर होउन त्याला मिळणारे दीघार्युष्य या गुणधर्मामुळे त्याला ‘अक्षय वृक्ष’ असेही म्हटले जाते. आजच्या काळात ब-याच विकास कामांसाठी पूर्वीच्याकाळी लावण्यात आलेल्या वडांच्या झाडांची तोड करण्यात आलेली आहे. वडाचे झाड हळूहळू वाढते. आजच्या गतिमान जगामध्ये बहुतेकजण लागवडीसाठी जलद वाढणा-या व शोभीवंत वृक्ष प्रजातीची निवड करतात. त्यामुळे पुरातन काळात जतन करण्यात आलेल्या या वृक्षांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते. आपल्या पुर्वजांनी वडाच्या झाडाचे महत्व ओळखुन संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेच्या निमित्याने वटपूजा करण्याची प्रथा रूढ केली. पुर्वीच्याकाळी स्त्रिया वडाच्या झाडाच्या ठिकाणी जावून वटपूजा करीत असत. तथापि आता वडांच्या झाडांची संख्या कमी झाल्याने वडाच्या फांद्या घरी आणून त्याची पूजा करण्याची पद्धत रुढ होत आहे. ही बाब वटपौर्णिमा साजरी करण्याच्या मुळ उद्देशासाठी पूर्णत: विसंगत असुन त्यामुळे उलट वडांच्या झाडांची बेसुमार छाटनी होते. या अनिष्ठ प्रथेला आळा घालण्यासाठी एसएमसी इंग्लिश स्कूलच्या शाळेच्या प्राचार्य मीना उबगडे यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शिक्षिका प्रतीक्षा कान्हेड,  भाग्यश्री ठोके, स्नेहल राऊत, राधिका बेदरकर, वर्षा पाटील तसेच राष्ट्रीय हरीतसेनेच्या विद्यार्थींच्या हस्ते वटपौर्णिमेला वटवृक्षारोपण केले जाते. जनजागृती म्हणून २६ जून रोजीदेखील वटवृक्षारोपण करण्यात आले तसेच या वटपौर्णिमेला पर्यावरण्याच्या दृष्टिने वडाला असलेले महत्व लक्षात घेउन वडाच्या फांद्या न तोडता वडांच्या झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे आवाहन राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी व ईको क्लबच्या चिमुकल्यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन व संचालन राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत जोशी यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी