शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जुलैपासून नववी ते बारावीची शाळा सुरू करण्याचे नियोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 16:41 IST

शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरून संभाव्य वेळापत्रक जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. 

वाशिम : कोरोनामुक्त असलेल्या क्षेत्रात नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन केले जात असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्वनियोजन म्हणून मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतींकडून विहित नमुन्यात जिल्हा परिषद प्रशासनाने माहिती मागविली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर राज्यात मार्च महिन्याच्या तिसºया आठवड्यापासून शाळा बंद आहेत. विदर्भात २६ जूनपासून शैक्षणिक सत्राला दरवर्षी सुरूवात होते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा केव्हा सुरू होतील, याचे निश्चित वेळापत्रक नाही. दुसरीकडे कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरून संभाव्य वेळापत्रक जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही, याची खात्री करूनच शासनाने ठरवून दिलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे नियोजन जिल्हास्तरावर केले जात आहे. त्यानुसार नववी, दहावी व बारावीचे वर्ग जुलै महिन्यापासून, सहावी ते आठवीचे वर्ग आॅगस्टपासून तर तिसरे ते पाचवीचे वर्ग सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याचे नियोजन आहे. पहिली ते दुसरीच्या वर्गााबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहेत. टिव्ही, रेडीओवर उपलब्ध होणारे शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी, ऐकविण्यासाठी पालकांना प्रवृत्त करण्याची जबाबादारीही शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविली आहे.दहावीचा निकाल लागल्यानंतर इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया आणि त्यानंतर अकरावीचा वर्ग सुरू करण्याचा विचार केला जाणार आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार शाळा सुरू करण्यापूर्वी स्थानिक पातळीवर ग्राम पंचायत किंवा नगर परिषद, नगर पंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, कोविड ग्रामस्तरीय समिती, शिक्षण तज्ज्ञ, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक आदींशी चर्चाविनिमय करूनच निर्णय घेतला जाणार आहे, असे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा