शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जुलैपासून नववी ते बारावीची शाळा सुरू करण्याचे नियोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 16:41 IST

शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरून संभाव्य वेळापत्रक जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. 

वाशिम : कोरोनामुक्त असलेल्या क्षेत्रात नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन केले जात असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्वनियोजन म्हणून मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतींकडून विहित नमुन्यात जिल्हा परिषद प्रशासनाने माहिती मागविली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर राज्यात मार्च महिन्याच्या तिसºया आठवड्यापासून शाळा बंद आहेत. विदर्भात २६ जूनपासून शैक्षणिक सत्राला दरवर्षी सुरूवात होते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा केव्हा सुरू होतील, याचे निश्चित वेळापत्रक नाही. दुसरीकडे कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरून संभाव्य वेळापत्रक जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही, याची खात्री करूनच शासनाने ठरवून दिलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे नियोजन जिल्हास्तरावर केले जात आहे. त्यानुसार नववी, दहावी व बारावीचे वर्ग जुलै महिन्यापासून, सहावी ते आठवीचे वर्ग आॅगस्टपासून तर तिसरे ते पाचवीचे वर्ग सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याचे नियोजन आहे. पहिली ते दुसरीच्या वर्गााबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहेत. टिव्ही, रेडीओवर उपलब्ध होणारे शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी, ऐकविण्यासाठी पालकांना प्रवृत्त करण्याची जबाबादारीही शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविली आहे.दहावीचा निकाल लागल्यानंतर इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया आणि त्यानंतर अकरावीचा वर्ग सुरू करण्याचा विचार केला जाणार आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार शाळा सुरू करण्यापूर्वी स्थानिक पातळीवर ग्राम पंचायत किंवा नगर परिषद, नगर पंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, कोविड ग्रामस्तरीय समिती, शिक्षण तज्ज्ञ, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक आदींशी चर्चाविनिमय करूनच निर्णय घेतला जाणार आहे, असे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा