शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

जुलैपासून नववी ते बारावीची शाळा सुरू करण्याचे नियोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 16:41 IST

शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरून संभाव्य वेळापत्रक जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. 

वाशिम : कोरोनामुक्त असलेल्या क्षेत्रात नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन केले जात असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्वनियोजन म्हणून मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतींकडून विहित नमुन्यात जिल्हा परिषद प्रशासनाने माहिती मागविली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर राज्यात मार्च महिन्याच्या तिसºया आठवड्यापासून शाळा बंद आहेत. विदर्भात २६ जूनपासून शैक्षणिक सत्राला दरवर्षी सुरूवात होते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा केव्हा सुरू होतील, याचे निश्चित वेळापत्रक नाही. दुसरीकडे कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरून संभाव्य वेळापत्रक जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही, याची खात्री करूनच शासनाने ठरवून दिलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे नियोजन जिल्हास्तरावर केले जात आहे. त्यानुसार नववी, दहावी व बारावीचे वर्ग जुलै महिन्यापासून, सहावी ते आठवीचे वर्ग आॅगस्टपासून तर तिसरे ते पाचवीचे वर्ग सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याचे नियोजन आहे. पहिली ते दुसरीच्या वर्गााबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहेत. टिव्ही, रेडीओवर उपलब्ध होणारे शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी, ऐकविण्यासाठी पालकांना प्रवृत्त करण्याची जबाबादारीही शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविली आहे.दहावीचा निकाल लागल्यानंतर इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया आणि त्यानंतर अकरावीचा वर्ग सुरू करण्याचा विचार केला जाणार आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार शाळा सुरू करण्यापूर्वी स्थानिक पातळीवर ग्राम पंचायत किंवा नगर परिषद, नगर पंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, कोविड ग्रामस्तरीय समिती, शिक्षण तज्ज्ञ, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक आदींशी चर्चाविनिमय करूनच निर्णय घेतला जाणार आहे, असे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा