शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

मंगरुळपीर शहरात बेशिस्त वाहतुकीचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 4:45 PM

मंगरुळपीर: बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यालगतच्या अतिक्रमणामुळे मंगरुळपीर शहरात अपघाताची मोठी अपघाताची निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअकोला चौक, मानोरा चौक, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ही महत्त्वाची आणि मोठ्या वर्दळीची ठिकाणी झाली आहेत.अतिक्रमणामुळे वाहने अगदी रस्त्यालगतच आणि वाटेल तशी उभी करण्यात येत असल्याने पायवाट काढणेही नागरिकांना कठीण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर: बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यालगतच्या अतिक्रमणामुळे मंगरुळपीर शहरात अपघाताची मोठी अपघाताची निर्माण झाली आहे. अतिक्रमणामुळे वाहने अगदी रस्त्यालगतच आणि वाटेल तशी उभी करण्यात येत असल्याने पायवाट काढणेही नागरिकांना कठीण होत आहे.मंगरुळपीर शहरांत अकोला चौक, मानोरा चौक, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ही महत्त्वाची आणि मोठ्या वर्दळीची ठिकाणी झाली आहेत. अकोला चौक हा शहरातील मुख्य चौक असून, येथूनचअमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिमकडे मार्ग जातात. त्यामुळे दरदिवशी शेकडो वाहनांची वर्दळ येथे सुरू असते. साहजकिच प्रवाशांची संख्याही येथे असते. त्याशिवाय या चौकांत उपाहारगृहे, खाणावळी असून, फळविके्रते, पानटपºया आदिंची गर्दी असतानाच या चौकांत चहुकडे वाहने अस्ताव्यस्त उभी ठेवण्यात येतात. मानोरा चौक, बसस्थानक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचीही हीच स्थिती आहे. त्यात मानोरा चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान शहरातील सर्वच महत्त्वाची कार्यालये आहेत. यामध्ये पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, विश्रामगृह, भूमीअभिलेख कार्यालय, विश्रामगृह आणि पंचायत समितीचा समावेश आहे. त्यामुळे येथे ग्रामीण भागांतून दरदिवसाला हजारावर लोक विविध कामासाठी येत असतात. या दोन्ही चौकादरम्यान रस्त्यावर विविध दुकाने थाटण्यात आली आहेत. रस्ता अरूंद असल्याने येथे वाहनांची वर्दळ वाढते आणि शहरातील जनतेसह ग्रामीण भागांतून येणाºया लोकांना त्याचा मोठा त्रास होतो. त्यातच बाबासाहेब आंबेडकर चौकातून वाशिम, अमरावती, अकोलाकडे जाणाºया वाहनांची संख्या मोठी असते आणि याच चौकातून शहरात जाणारा एक मुख्य रस्ताही आहे. वाशिम-अमरावती मार्गावर धावणारी वाहने शहरातून येणाºया वाहनधारकाला अगदी चौकात येईपर्यंतही दिसत नाहीत. अशात भरधाव येणाºया वाहनांमुळे अपघाताची भिती आहे. याची दखल घेऊन तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन, नगर पालिका प्रशासनाने वाहनधारकांना शिस्त लावण्यासह बेकायदा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरTrafficवाहतूक कोंडी