शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

सुट्यांमुळे रखडले खरडलेल्या जमिनींचे पंचनामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 15:54 IST

नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण तत्काळ होणे अपेक्षित होते; परंतू शनिवार व रविवारची सुटी आल्याने नुकसानग्रस्तांच्या भेटीला प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी जाण्याचे टाळले.

ठळक मुद्दे२२ जूनच्या मध्यरात्रीपासून २३ जूनच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात तब्बल २०४ मिलीमिटर (सरासरी ३४ मिलीमिटर) पाऊस कोसळला. यामुळे ग्रामीण भागातील नाल्यांना पूर येऊन त्याचे पाणी शेतात घुसल्याने अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या. ही बाब लक्षात घेवून महसूल विभागाकडून विनाविलंब नुकसानग्रस्तांच्या शेतीचे सर्वेक्षण सुरू होणे आवश्यक होते.

वाशिम : २२ जूनच्या मध्यरात्रीपासून २३ जूनच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात तब्बल २०४ मिलीमिटर (सरासरी ३४ मिलीमिटर) पाऊस कोसळला. यामुळे ग्रामीण भागातील नाल्यांना पूर येऊन त्याचे पाणी शेतात घुसल्याने अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या; तर काहीठिकाणी केलेली पेरणी वाहून गेली. दरम्यान, नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण तत्काळ होणे अपेक्षित होते; परंतू शनिवार व रविवारची सुटी आल्याने नुकसानग्रस्तांच्या भेटीला प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी जाण्याचे टाळले. सोमवारपासून मात्र ही प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.गतवर्षी सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे यंदा अल्पावधीतच शेतशिवारांमधील जलस्त्रोत पूर्णत: आटले होते. अशा बिकट परिस्थितीत वाशिम जिल्ह्यातील काही शेतकºयांनी चालू पावसाळ्यात पहिल्या एक-दोन पावसाच्या भरोशावर खरीप हंगामातील पेरणी उरकती घेतली. अनुकूल वातावरणामुळे बीजांकुर होऊन पिके देखील डोलायला लागली. मात्र, २२ जूनच्या मध्यरात्रीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकवेळ शेतकºयांना संकटात पाडले असून नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसून शेलगाव बोंदाडे, कळमेश्वर, अनसिंग, सोंडा, इलखी, कोंडाळा महाली या गावांसह इतरही अनेक गावांमधील शेतजमिनी खरडल्या गेल्या. काही शेतशिवारांमध्ये तर माती वाहून गेल्याने सद्या सर्वत्र दगडधोंडे पसरल्याचे दिसून येत आहे. अशा जमिनींमध्ये दुबार पेरणी होण्याचीही शक्यता धुसर असल्याने शेतकरी पुन्हा एकवेळ मोठ्या संकटात सापडले आहेत. ही बाब लक्षात घेवून महसूल विभागाकडून विनाविलंब नुकसानग्रस्तांच्या शेतीचे सर्वेक्षण सुरू होणे आवश्यक होते. मात्र, सुट्यांमध्ये रममान प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर कृषी सहायक, ग्रामसेवक आणि तलाठी अशा तीन लोकांच्या चमूचे पथक तयार करण्यात आले असून त्यांच्यावर नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यानुसार, २२ जूनच्या पावसाने झालेल्या नुकसानाचेही सर्वेक्षण केले जाईल.- बाळासाहेब बोराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी