शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पैनगंगा नदीचे खोलीकरण, रूंदीकरण रखडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 17:50 IST

या नदीमधून आजपर्यंत कधीही गाळ काढलेला नाही तसेच नदी  काठावरील दोन्ही बाजुने वाढलेली झाडे, झुडपांची तोड केली नाही. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड तालुक्यातून वाहणाºया पैनगंगा नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण अद्याप झाले नसल्याने, यासंदर्भात शेतकºयांसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी १३ मे रोजी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली. या नदीपात्राचे रूंदीकरण व खोलीकरण झाल्यास शेतकºयांना याचा निश्चितच फायदा होईल, ही बाबही पटवून देण्यात आली.रिसोड तालुका हा महाराष्ट्र शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीमध्ये समाविष्ट असून मागील १० ते १५ वर्षांपासून रिसोड तालुक्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वीच रिसोड तालुक्यात पाणीटंचाई निर्माण होते. यावर्षीदेखील रिसोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. कमी पर्जन्यमानाचा विपरित परिणाम कृषीक्षेत्रावरही जाणवतो. सध्याच्या स्थितीत मनुष्यासह, जनावरे व शेतीसाठीही पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.रिसोड तालुक्यामधून वाहणारी व रिसोडची जीवनवाहीनी समजल्या जाणारी पैनगंगा नदी ही अनेक गावांची तहान भागविण्याबरोबरच शेकडो शेतकºयांचे हिरवे स्वप्न साकारत आहेत. मात्र, या नदीमधून आजपर्यंत कधीही गाळ काढलेला नाही तसेच नदी  काठावरील दोन्ही बाजुने वाढलेली झाडे, झुडपांची तोड केली नाही. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजुची झाडे, झुडपे काढल्यास रुंदीकरण होऊ शकते तसेच या नदीमधुन गाळ काढला तर येत्या पावसाळ्यात नदीत मुबलक पाणीसाठा राहू शकेल, ही बाब भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्या निदर्शनात आणून दिली. नदीमधील गाळाचा उपसा केला तर हा गाळ आजुबाजुच्या शेतात टाकून शेतजमीन सुपीकही करता येवू शकते. सदर काम हे शासनाच्या पाटबंधारे विभाग, जलसंधारण किंवा भारतीय जैन संघटना आणि शासनाच्या संयुक्तपणे करावे, अशी मागणी ठाकूर यांच्यासह शेतकºयांनी  निवेदनाव्दारे केली आहे.

टॅग्स :washimवाशिम