शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

पैनगंगा नदीचे खोलीकरण, रूंदीकरण रखडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 17:50 IST

या नदीमधून आजपर्यंत कधीही गाळ काढलेला नाही तसेच नदी  काठावरील दोन्ही बाजुने वाढलेली झाडे, झुडपांची तोड केली नाही. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड तालुक्यातून वाहणाºया पैनगंगा नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण अद्याप झाले नसल्याने, यासंदर्भात शेतकºयांसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी १३ मे रोजी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली. या नदीपात्राचे रूंदीकरण व खोलीकरण झाल्यास शेतकºयांना याचा निश्चितच फायदा होईल, ही बाबही पटवून देण्यात आली.रिसोड तालुका हा महाराष्ट्र शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीमध्ये समाविष्ट असून मागील १० ते १५ वर्षांपासून रिसोड तालुक्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वीच रिसोड तालुक्यात पाणीटंचाई निर्माण होते. यावर्षीदेखील रिसोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. कमी पर्जन्यमानाचा विपरित परिणाम कृषीक्षेत्रावरही जाणवतो. सध्याच्या स्थितीत मनुष्यासह, जनावरे व शेतीसाठीही पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.रिसोड तालुक्यामधून वाहणारी व रिसोडची जीवनवाहीनी समजल्या जाणारी पैनगंगा नदी ही अनेक गावांची तहान भागविण्याबरोबरच शेकडो शेतकºयांचे हिरवे स्वप्न साकारत आहेत. मात्र, या नदीमधून आजपर्यंत कधीही गाळ काढलेला नाही तसेच नदी  काठावरील दोन्ही बाजुने वाढलेली झाडे, झुडपांची तोड केली नाही. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजुची झाडे, झुडपे काढल्यास रुंदीकरण होऊ शकते तसेच या नदीमधुन गाळ काढला तर येत्या पावसाळ्यात नदीत मुबलक पाणीसाठा राहू शकेल, ही बाब भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्या निदर्शनात आणून दिली. नदीमधील गाळाचा उपसा केला तर हा गाळ आजुबाजुच्या शेतात टाकून शेतजमीन सुपीकही करता येवू शकते. सदर काम हे शासनाच्या पाटबंधारे विभाग, जलसंधारण किंवा भारतीय जैन संघटना आणि शासनाच्या संयुक्तपणे करावे, अशी मागणी ठाकूर यांच्यासह शेतकºयांनी  निवेदनाव्दारे केली आहे.

टॅग्स :washimवाशिम