शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

पपई पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:03 IST

बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांची वाढ खुंटल्याने बांबर्डा परिसरातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबांबर्डा (वाशिम) : पारंपरिक पिकांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकºयांनी पर्यायी पिकपद्धती अंगीकारून पपई उत्पादनाकडे लक्ष केंद्रीत केले; मात्र या पिकावरही सद्य:स्थितीत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांची वाढ खुंटल्याने बांबर्डा परिसरातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारा यासारख्या नैसर्गीक संकटांमुळे गत काही वर्षांपासून खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे काही प्रयोगशील शेतकºयांनी पर्यायी पिकपद्धतीचा अवलंब केला असून बांबर्डा परिसरातील शेतकरी पपई लागवडीकडे वळले आहेत. यंदाही अनेक शेतकºयांनी पपईची लागवड केली असून चांगला दर व एकरकमी पैसा शेतकºयांच्या हाती येत असल्याने पपईच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. यासाठी शेतकºयांनी तायवान या नवीन विकसित वाणाची निवड केली. पपई हे उष्ण कटीबंधात वाढणारे पिक असून वर्षभरात जून, जुलै, सप्टेंबर-आॅक्टोंबर व जानेवारी-फेब्रुवारी अशा ३ टप्प्यात पपईची लागवड केल्या जाते; मात्र जून-जुलै व सप्टेंबर-आॅक्टोंबर या महिन्यात पपईची लागवड केल्यास पावसामुळे शेताचे रस्ते चिखलमय असल्याने तयार झालेला माल शेताबाहेर काढण्यास शेतकºयांना अडचण जाणवते म्हणून साधारणपणे जानेवारी ते मार्च यादरम्यान बांबर्डा परिसरात पपईची लागवड केल्या जाते. परिसरात मागील वर्षीपेक्षा पपईच्या क्षेत्रात वाढ झाली असताना त्यावर आलेल्या बुरशीजन्य रोगामुळे मात्र उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे.या बुरशीजन्य रोगामुळे पपईच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळत आहे. उत्पादक शेतकºयांनी रोगापासून बचावाकरिता आतापर्यंत महागड्या बुरशीनाशकाची फवारणीे केली. तरीही रोग नियंत्रणात येत नसून कृषी विभागाने पपई उत्पादक शेतकºयांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी