शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

सिंचन उपसा थांबविण्याचे आदेश मिळाले १२ दिवस उशिरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 13:16 IST

अडोळ प्रकल्पातील सिंचनासाठी होणारा उपसा थांबविण्याचे काम विज वितरणला करायवायचे होते; परंतु सदर आदेशाचे पत्रच विज वितरणला चक्क १२ दिवसांनी उशिरा प्राप्त झाले.

ठळक मुद्देप्रशासनाचा गोंधळअडोळ प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत

शिरपूर जैन: यंदा जाणवणाºया पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आले. या संदर्भात वाशिम लघू पाटबंधारे विभागाने ११ आॅक्टोबर रोजी लिखित आदेशही जारी केले. त्यानुसार अडोळ प्रकल्पातील सिंचनासाठी होणारा उपसा थांबविण्याचे काम विज वितरणला करायवायचे होते; परंतु सदर आदेशाचे पत्रच विज वितरणला चक्क १२ दिवसांनी उशिरा प्राप्त झाले. या कालावधित आधीच तळ गाठलेल्या प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर शेतीसाठी झाल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे.

यंदा अल्प पावसामुळे जलप्रकल्पांनी तळ गाठला असताना पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आले आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पाचाही समावेश आहे. अडोळ प्रकल्पातून रिसोड, शिरपूर, रिठद, वाघी, शेलगाव आदि गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत या प्रकल्पात २० टक्के उपयुक्त जलसाठा उरला आहे. त्यातच या प्रकल्पातून सिंचनासाठी होत असलेला उपसा आणि वाढत्या उष्म्यामुळे प्रकल्पातील पातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे जनतेला पाणीटंचाईच्या समस्येचा  सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ही बाब लक्षात घेऊन लूघ पाटबंधारे विभाग वाशिम यांनी अडोळ प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकल्पातून सिंचनासाठी होत असलेला पाणी उपसा थांबविण्यासाठी विज जोडण्या खंडीत करण्याच्या सूचना देणारे पत्र विज वितरणच्या नावे काढले; परंतु ११ आॅक्टोबर रोजी काढलेले हे पत्र विज वितरणला चक्क १२ दिवसांनंतर प्राप्त झाले. या १२ दिवसांच्या कालावधित सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाल्याने प्रकल्पातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे काही दिवस टाळता येणारी पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होणार आहे. प्रशासनाच्या गोंधळामुळेच हा प्रकार घडला आहे. 

टॅग्स :WaterपाणीDamधरण