शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

सिंचन उपसा थांबविण्याचे आदेश मिळाले १२ दिवस उशिरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 13:16 IST

अडोळ प्रकल्पातील सिंचनासाठी होणारा उपसा थांबविण्याचे काम विज वितरणला करायवायचे होते; परंतु सदर आदेशाचे पत्रच विज वितरणला चक्क १२ दिवसांनी उशिरा प्राप्त झाले.

ठळक मुद्देप्रशासनाचा गोंधळअडोळ प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत

शिरपूर जैन: यंदा जाणवणाºया पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आले. या संदर्भात वाशिम लघू पाटबंधारे विभागाने ११ आॅक्टोबर रोजी लिखित आदेशही जारी केले. त्यानुसार अडोळ प्रकल्पातील सिंचनासाठी होणारा उपसा थांबविण्याचे काम विज वितरणला करायवायचे होते; परंतु सदर आदेशाचे पत्रच विज वितरणला चक्क १२ दिवसांनी उशिरा प्राप्त झाले. या कालावधित आधीच तळ गाठलेल्या प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर शेतीसाठी झाल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे.

यंदा अल्प पावसामुळे जलप्रकल्पांनी तळ गाठला असताना पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आले आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पाचाही समावेश आहे. अडोळ प्रकल्पातून रिसोड, शिरपूर, रिठद, वाघी, शेलगाव आदि गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत या प्रकल्पात २० टक्के उपयुक्त जलसाठा उरला आहे. त्यातच या प्रकल्पातून सिंचनासाठी होत असलेला उपसा आणि वाढत्या उष्म्यामुळे प्रकल्पातील पातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे जनतेला पाणीटंचाईच्या समस्येचा  सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ही बाब लक्षात घेऊन लूघ पाटबंधारे विभाग वाशिम यांनी अडोळ प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकल्पातून सिंचनासाठी होत असलेला पाणी उपसा थांबविण्यासाठी विज जोडण्या खंडीत करण्याच्या सूचना देणारे पत्र विज वितरणच्या नावे काढले; परंतु ११ आॅक्टोबर रोजी काढलेले हे पत्र विज वितरणला चक्क १२ दिवसांनंतर प्राप्त झाले. या १२ दिवसांच्या कालावधित सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाल्याने प्रकल्पातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे काही दिवस टाळता येणारी पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होणार आहे. प्रशासनाच्या गोंधळामुळेच हा प्रकार घडला आहे. 

टॅग्स :WaterपाणीDamधरण