शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

तोरणाळा येथील २० एकर क्षेत्रातील संत्रा बागा सुकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:43 IST

५ शेतकºयांच्या मिळून २० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील संत्रा बागा सुकल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: सिंचन विहिरी आटल्या असतानाच रखरखत्या उन्हाचा परिणाम झाल्याने तब्बल ५ शेतकºयांच्या मिळून २० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील संत्रा बागा सुकल्या आहेत. त्यामुळे या शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाशिम तालुक्यातील तोरणाळा येथे हा प्रकार पाहायला मिळत आहे.गतवर्षीच्या समाधानकारक पावसानंतरही वाढलेल्या उष्णतामानामुळे जिल्ह्यातील ९० टक्के विहिरींनी हिवाळ्याच्या अखेरपासूनच तळ गाठला. त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम झालाच शिवाय फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात तोरणाळा येथील ५ शेतकºयांच्या मिळून २० एकर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रातील संत्रा बागेतील शेकडो झाडे रखरखत्या उन्हामुळे पूर्णपणे सुकली आहेत. आता ही झाडे तोडून सरपण करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे या शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात परसरात विठोबा गोटे, मंगेश रामचंद्र मगर, त्र्यंबक तुकाराम मुठाळ, रामदास ज्ञानबा मुठाळ, गणपत रामजी चौधरी आदि शेतकºयांचा समावेश आहे. दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्यात वाशिम तालुक्यासह मानोरा, मंगरुळपीर आणि मालेगाव तालुक्यातील काही शेतकºयांच्या संत्रा बागा सुकल्याने संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.  जिल्हाधिकाºयांकडे मदतीची मागणीरखरखत्या उन्हामुळे संत्रा बागा सुकल्याने तोरणाळा येथील पाचही शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. आता त्यांच्या संत्रा बागातून उत्पादनाची आशाही राहिली नाही. त्यामुळे हताश झालेल्या या शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे २५ जुन रोजी निवेदन सादर करून आपली व्यथा मांडत सुकलेल्या बागांची पाहणी करण्यासह शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी