शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

तोरणाळा येथील २० एकर क्षेत्रातील संत्रा बागा सुकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:43 IST

५ शेतकºयांच्या मिळून २० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील संत्रा बागा सुकल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: सिंचन विहिरी आटल्या असतानाच रखरखत्या उन्हाचा परिणाम झाल्याने तब्बल ५ शेतकºयांच्या मिळून २० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील संत्रा बागा सुकल्या आहेत. त्यामुळे या शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाशिम तालुक्यातील तोरणाळा येथे हा प्रकार पाहायला मिळत आहे.गतवर्षीच्या समाधानकारक पावसानंतरही वाढलेल्या उष्णतामानामुळे जिल्ह्यातील ९० टक्के विहिरींनी हिवाळ्याच्या अखेरपासूनच तळ गाठला. त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम झालाच शिवाय फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात तोरणाळा येथील ५ शेतकºयांच्या मिळून २० एकर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रातील संत्रा बागेतील शेकडो झाडे रखरखत्या उन्हामुळे पूर्णपणे सुकली आहेत. आता ही झाडे तोडून सरपण करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे या शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात परसरात विठोबा गोटे, मंगेश रामचंद्र मगर, त्र्यंबक तुकाराम मुठाळ, रामदास ज्ञानबा मुठाळ, गणपत रामजी चौधरी आदि शेतकºयांचा समावेश आहे. दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्यात वाशिम तालुक्यासह मानोरा, मंगरुळपीर आणि मालेगाव तालुक्यातील काही शेतकºयांच्या संत्रा बागा सुकल्याने संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.  जिल्हाधिकाºयांकडे मदतीची मागणीरखरखत्या उन्हामुळे संत्रा बागा सुकल्याने तोरणाळा येथील पाचही शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. आता त्यांच्या संत्रा बागातून उत्पादनाची आशाही राहिली नाही. त्यामुळे हताश झालेल्या या शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे २५ जुन रोजी निवेदन सादर करून आपली व्यथा मांडत सुकलेल्या बागांची पाहणी करण्यासह शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी