शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकार भाजपाचेच - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 16:24 IST

विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकारही भाजपाचेच राहणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे शनिवार, १ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देसंविधान बदलण्याच्या नव्हे; तर ते अधिक मजबूत करण्याचा सरकारचा विचार भाजपा सरकारने आपल्या कारकिर्दीत ‘अ‍ॅॅट्रॉसिटी अ‍ॅॅक्ट’ला कुठलाही धक्का बसू दिला नाही.हितकारी ध्येयधोरणांमुळे ‘आरपीआय’ यापुढेही भाजपासोबतच राहणार असल्याचे ना. आठवले म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : देशातील काळा पैसा बाहेर यावा, यासाठी भाजपा सरकारने जाहीर केलेला नोटाबंदीचा निर्णय निश्चितपणे यशस्वी झाला. याशिवाय कर चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी देशभरात ‘जीएसटी’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. मुद्रा, उज्वला, पीकविमा, ग्रामसडक यासारख्या महत्वाकांक्षी योजना राबवून तळागाळातील लोकांचे हित जोपासले जात आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकारही भाजपाचेच राहणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे शनिवार, १ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.विद्यमान भाजपा सरकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार असल्याच्या वावड्या विरोधकांकडून उठविल्या जात आहेत; परंतु संविधान बदलण्याच्या नव्हे; तर ते अधिक मजबूत करण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगून ना. आठवले पुढे म्हणाले, की भाजपा सरकारने आपल्या कारकिर्दीत ‘अ‍ॅॅट्रॉसिटी अ‍ॅॅक्ट’ला कुठलाही धक्का बसू दिला नाही. याशिवाय जातीनिहाय आरक्षणाचा विषय देखील सरकार अभ्यासपूर्ण हाताळत आहे. सरकारच्या याच सर्वसामान्यांच्या हितकारी ध्येयधोरणांमुळे ‘आरपीआय’ यापुढेही भाजपासोबतच राहणार असल्याचे ना. आठवले म्हणाले.कोरेगाव भीमा येथील दंगल, संभाजी भिडे यांची भूमिका, आदिंबाबत छेडले असता, कोरेगाव भीमा येथील दंगल सवर्णांनी घडवून आणल्याचे सांगून त्याच्याशी एल्गार परिषदेचा कुठलाही संबंध नसल्याचे ते म्हणाले. संविधानाला विरोध करून अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी भूमिका संभाजी भिडे यांनी बाळगली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने पुढे रेटली जात आहे. पोलिस प्रशासनाने यादृष्टीने तपास करणे आवश्यक असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, रिपाइं जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांच्यासह ‘आरपीआय’चे पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेwashimवाशिमBJPभाजपाPoliticsराजकारण