शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Operation Muskan : २० मुलींचा अद्यापही लागला नाही शाेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 10:55 IST

Operation Muskan: पळून गेलेल्या ७९ मुलींपैकी ५९ मुलींचा व चार मुलांचा शाेध लावण्यात पाेलिसांना यश आले असले तरी अद्याप २० मुलींचा शाेध लागलेला नाही.

ठळक मुद्दे७९ पैकी ५९ मुलींचा शाेध लागला.ज्या मुली बेपत्ता आहेत त्यांचा शाेध घेणे सुरु आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : हरवलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारच्या आदेशान्वये १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत   जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात आहे. याअंतर्गत एकही मुलाचा शाेध लागलेला नाही. तसेच जानेवारी ते नाेव्हेंबर २०२० दरम्यान हरविलेल्या, पळून गेलेल्या ७९ मुलींपैकी ५९ मुलींचा व घरून पळून गेलेल्या चारही मुलांचा शाेध लावण्यात पाेलिसांना यश आले असले तरी अद्याप २० मुलींचा शाेध लागलेला नाही.ऑपरेशन मुस्कान अंतर्गत पळून गेलेल्या, बेपत्ता असलेल्या मुलांचा शाेध पाेलीस विभागाकडून घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले असून, ३१ डिसेंबरनंतर या माेहिमेतील कामगिरीबाबतची माहिती देण्यात येणार असल्याचे पाेलीस विभागाकडून सांगण्यात आले.घरून पळून गेलेली मुले वाशिम, मंगरूळपीर, कारंजा व शिरपूर येथीलवाशिम जिल्ह्यातून जानेवारी ते नाेव्हेंबर २०२० दरम्यान घरून पळून निघून गेलेल्या मुलांमध्ये जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा व शिरपूर येथील मुलांचा समावेश आहे. घरातील कटकट, काही तरी करण्याची मनी जिद्द या कारणामुळे ही मुले घरून पळून गेली हाेती. या मुलांना मुंबई, पुणे, नागपूर येथून पाेलिसांनी शाेधले व त्यांच्या      कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

पळून जाणाऱ्या मुली विविध प्रलाेभनांच्या बळी जिल्ह्यातून जानेवारी ते नाेव्हेंबर २०२० दरम्यान घरून निघून गेलेल्या, पळून गेलेल्या तब्बल ७९ मुलींपैकी बहुतांश मुली या लग्नाचे आमिष, नाेकरी लावून देण्याच्या प्रलाेभनामुळे घरून पळून गेल्या. यातील काही मुली स्वत:हून घरी परतल्या तर काहींचा पाेलिसांनी शाेध घेत पालकांच्या स्वाधीन केले. ७९ पैकी ५९ मुलींचा शाेध लागला. अद्याप २० मुलींचा शाेध सुरू आहे.

ऑपरेशन मुस्कानद्वारे मुलांचा शाेध घेणे सुरूजिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात आहे. याअंतर्गत १ ते ३० डिसेंबरदरम्यान बेपत्ता, हरवलेल्या मुलांचा शाेध घेणे सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील मुलगा घरून निघून गेलेल्यांपैकी एकही शाेध बाकी नाही. आतापर्यंत हरविलेल्या चारही मुलांचा शाेध पाेलिसांनी घेऊन मुलांना पाल्यांच्या स्वाधीन केले. मुलींचा शाेध घेणे सुरू आहे.

सर्व पाेलीस स्टेशनला ऑपरेशनच्या सूचनाजिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात असून यासंदर्भात सर्व पाेलीस स्टेशनला सूचना देण्यात आल्या आहेत. घरुन निघून गेलेल्या, बेपत्ता असलेल्या जवळपास मुलांचा शाेध यापूवीर्च लागला आहे. ज्या मुली बेपत्ता आहेत त्यांचा शाेध घेणे सुरु आहे.- शिवा ठाकरे, स्थानिक गुन्हे शाखा

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसMissingबेपत्ता होणं