शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

"स्वाधार योजने’साठी अर्ज करण्याला केवळ दोन दिवस शिल्लक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 20:07 IST

शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांकरीता शासनाने सुरू केलेल्या ‘स्वाधार' योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असून, पात्र विद्यार्थ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

ठळक मुद्देनिवास व भोजन भत्ता मिळणार अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनूसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने ‘स्वाधार योजना’ अंमलात आणली  आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असून, पात्र विद्यार्थ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी १३ नोव्हेंबर रोजी केले.शासकीय महाविद्यालयांची संख्या व तेथे प्रवेश घेणाºया मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शासकीय वसतीगृहांची सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनादेखील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशातून डॉ. बाबासाहेब आंबेडर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेला विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही वार्षिक रक्कम असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला इयत्ता १० वी, १२ वी, पदवी व पदविका परीक्षेमध्ये किमान ६०  टक्के गुण असणे आवश्यक आहे. याच प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट ५० टक्के आहे. विद्यार्थी जर मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे, ठाणे, नागपूर याठिकाणी शिक्षण घेत असेल, तर एकूण भत्ता ६० हजार रुपये विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत. महसूल विभागीय शहर, क वर्ग महानगरपालिका शहर यामध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना एकूण ५१ हजार रुपये आणि उर्वरित ठिकाणी उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी एकूण ४३ हजार रुपये मिळणार आहे. या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ५ हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष २ हजार रुपये रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी १५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन केदार यांनी केले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी