शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

"स्वाधार योजने’साठी अर्ज करण्याला केवळ दोन दिवस शिल्लक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 20:07 IST

शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांकरीता शासनाने सुरू केलेल्या ‘स्वाधार' योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असून, पात्र विद्यार्थ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

ठळक मुद्देनिवास व भोजन भत्ता मिळणार अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनूसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने ‘स्वाधार योजना’ अंमलात आणली  आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असून, पात्र विद्यार्थ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी १३ नोव्हेंबर रोजी केले.शासकीय महाविद्यालयांची संख्या व तेथे प्रवेश घेणाºया मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शासकीय वसतीगृहांची सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनादेखील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशातून डॉ. बाबासाहेब आंबेडर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेला विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही वार्षिक रक्कम असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला इयत्ता १० वी, १२ वी, पदवी व पदविका परीक्षेमध्ये किमान ६०  टक्के गुण असणे आवश्यक आहे. याच प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट ५० टक्के आहे. विद्यार्थी जर मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे, ठाणे, नागपूर याठिकाणी शिक्षण घेत असेल, तर एकूण भत्ता ६० हजार रुपये विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत. महसूल विभागीय शहर, क वर्ग महानगरपालिका शहर यामध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना एकूण ५१ हजार रुपये आणि उर्वरित ठिकाणी उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी एकूण ४३ हजार रुपये मिळणार आहे. या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ५ हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष २ हजार रुपये रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी १५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन केदार यांनी केले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी