शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील धरणांत केवळ ३ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 15:57 IST

वाशिम : जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १३१ लघू अशा एकूण १३४ धरणांमध्ये सद्य:स्थितीत केवळ तीन टक्के जलसाठा उरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १३१ लघू अशा एकूण १३४ धरणांमध्ये सद्य:स्थितीत केवळ तीन टक्के जलसाठा उरला आहे. दुसरीकडे शहरांसह ग्रामीण भागातील विहिरी आणि कुपनलिकांनीही तळ गाठल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी लावलेले टँकर भरायलाही अनेक ठिकाणी पाणीच मिळत नसल्याची बिकट स्थिती यामुळे उद्भवली आहे.जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात एकबुर्जी हा मध्यम प्रकल्प असून ३५ लघूप्रकल्प आहेत. त्यात आजमितीस केवळ १.५० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मालेगाव तालुक्यातील सोनल मध्यम प्रकल्पासह २४ प्रकल्पांमध्ये १.७७ टक्के, कारंजा तालुक्यातील अडाण मध्यम प्रकल्पासह १७ प्रकल्पांमध्ये ८ टक्के पाणीसाठा असून मंगरूळपीर तालुक्यातील १५ लघूप्रकल्पांमध्ये १.३२ टक्के, रिसोडातील १८ प्रकल्पांमध्ये २.४७ टक्के आणि मानोरा तालुक्यातील २४ लघूप्रकल्पांमध्ये ४.२३ टक्के असा सरासरी तीन टक्क्यांच्या आसपास जलसाठा शिल्लक राहिला आहे.पाण्यासंदर्भातील स्थिती अत्यंत विदारक स्थितीत असताना अद्यापपर्यंत पावसाचाही थांगपत्ता नसल्याने अडचणींमध्ये भर पडली आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहे.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३५४ विहिरींचे अधिग्रहण केले असून १० गावांमधील ७ नळयोजनांच्या विशेष दुरूस्तीची उपाययोजना करण्यात आली. यासह ५८ गावांमध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र अधिग्रहित करण्यात आलेल्या अधिकांश विहिरींची पाणीपातळीही खोलवर गेल्याने अनेक ठिकाणी टँकर भरायलाही पाणी मिळेनासे झाले आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर पोहचायलाही विलंब लागत असल्याची ओरड होत आहे. तथापि, आगामी काही दिवसांत मोठ्या स्वरूपातील तथा संततधार पावसाशिवाय उद्भवलेल्या या बिकट स्थितीवर मात करता येणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. १३४ पैकी ११३ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर!यंदा १६ जूनपर्यंतही पाऊस होण्याचे कुठलेच ठोस संकेत नसल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील लघू आणि मध्यम अशा एकंदरित १३४ प्रकल्पांपैकी वाशिम तालुक्यातील ३२, मालेगाव तालुक्यातील २०, कारंजा तालुक्यातील १०, मंगरूळपीर तालुक्यातील १४, रिसोड तालुक्यातील १६ आणि मानोरा तालुक्यातील १८ अशा तब्बल ११३ प्रकल्पांची पाणीपातळी सद्या शून्यावर पोहचलेली असून उर्वरित प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती देखील चिंताजनक आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईDamधरण