शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

वाशिम जिल्ह्यातील धरणांत केवळ ३ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 15:57 IST

वाशिम : जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १३१ लघू अशा एकूण १३४ धरणांमध्ये सद्य:स्थितीत केवळ तीन टक्के जलसाठा उरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १३१ लघू अशा एकूण १३४ धरणांमध्ये सद्य:स्थितीत केवळ तीन टक्के जलसाठा उरला आहे. दुसरीकडे शहरांसह ग्रामीण भागातील विहिरी आणि कुपनलिकांनीही तळ गाठल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी लावलेले टँकर भरायलाही अनेक ठिकाणी पाणीच मिळत नसल्याची बिकट स्थिती यामुळे उद्भवली आहे.जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात एकबुर्जी हा मध्यम प्रकल्प असून ३५ लघूप्रकल्प आहेत. त्यात आजमितीस केवळ १.५० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मालेगाव तालुक्यातील सोनल मध्यम प्रकल्पासह २४ प्रकल्पांमध्ये १.७७ टक्के, कारंजा तालुक्यातील अडाण मध्यम प्रकल्पासह १७ प्रकल्पांमध्ये ८ टक्के पाणीसाठा असून मंगरूळपीर तालुक्यातील १५ लघूप्रकल्पांमध्ये १.३२ टक्के, रिसोडातील १८ प्रकल्पांमध्ये २.४७ टक्के आणि मानोरा तालुक्यातील २४ लघूप्रकल्पांमध्ये ४.२३ टक्के असा सरासरी तीन टक्क्यांच्या आसपास जलसाठा शिल्लक राहिला आहे.पाण्यासंदर्भातील स्थिती अत्यंत विदारक स्थितीत असताना अद्यापपर्यंत पावसाचाही थांगपत्ता नसल्याने अडचणींमध्ये भर पडली आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहे.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३५४ विहिरींचे अधिग्रहण केले असून १० गावांमधील ७ नळयोजनांच्या विशेष दुरूस्तीची उपाययोजना करण्यात आली. यासह ५८ गावांमध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र अधिग्रहित करण्यात आलेल्या अधिकांश विहिरींची पाणीपातळीही खोलवर गेल्याने अनेक ठिकाणी टँकर भरायलाही पाणी मिळेनासे झाले आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर पोहचायलाही विलंब लागत असल्याची ओरड होत आहे. तथापि, आगामी काही दिवसांत मोठ्या स्वरूपातील तथा संततधार पावसाशिवाय उद्भवलेल्या या बिकट स्थितीवर मात करता येणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. १३४ पैकी ११३ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर!यंदा १६ जूनपर्यंतही पाऊस होण्याचे कुठलेच ठोस संकेत नसल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील लघू आणि मध्यम अशा एकंदरित १३४ प्रकल्पांपैकी वाशिम तालुक्यातील ३२, मालेगाव तालुक्यातील २०, कारंजा तालुक्यातील १०, मंगरूळपीर तालुक्यातील १४, रिसोड तालुक्यातील १६ आणि मानोरा तालुक्यातील १८ अशा तब्बल ११३ प्रकल्पांची पाणीपातळी सद्या शून्यावर पोहचलेली असून उर्वरित प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती देखील चिंताजनक आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईDamधरण