शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

वाशिम जिल्ह्यातील १३४ धरणांमध्ये केवळ १८ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 14:34 IST

दमदार पावसाअभावी धरणांच्या पाणीपातळीत अद्यापपर्यंत अपेक्षित वाढ झालेली नाही.

ठळक मुद्देसोनल प्रकल्पात जेमतेम ७.९९ टक्के जलसाठा गोळा झाला आहे. १६ लघूप्रकल्पांमध्ये १९.९३ असा सरासरी २०.४१ टक्के जलसाठा झाला आहे.रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी पुरविणे कदापि शक्य होणार नाही.

वाशिम : चालूवर्षीच्या पावसाळ्यात रिमझिम स्वरूपात का होईना पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांची स्थिती समाधानकारक आहे; मात्र दमदार पावसाअभावी धरणांच्या पाणीपातळीत अद्यापपर्यंत अपेक्षित वाढ झालेली नाही. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील लघू व मध्यम अशा एकंदरित १३४ धरणांमध्ये केवळ १८.८६ टक्के जलसाठा गोळा झाला आहे. यात वाशिमच्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पात ४१.८५, मालेगाव तालुक्यातील सोनलमध्ये १३.८९; तर कारंजा तालुक्यातील सोनल प्रकल्पात जेमतेम ७.९९ टक्के जलसाठा गोळा झाला आहे. याशिवाय वाशिम तालुक्यातील ३५ लघूप्रकल्पांमध्ये आजरोजी ३५.६३, मालेगाव तालुक्यातील २३ प्रकल्पांमध्ये १५.२८, रिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांमध्ये १४.१४, मंगरूळपीर तालुक्यातील १५ प्रकल्पांमध्ये १०.३५, मानोरा तालुक्यातील २४ प्रकल्पांमध्ये १६.०३; तर कारंजा तालुक्यातील १६ लघूप्रकल्पांमध्ये १९.९३ असा सरासरी २०.४१ टक्के जलसाठा झाला आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांमध्ये संततधार तथा मोठ्या स्वरूपातील पावसाने हजेरी न लावल्यास आणि धरणे तुडूंब न भरल्यास आगामी रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी पुरविणे कदापि शक्य होणार नाही. यासोबतच पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :washimवाशिमDamधरण