शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील १३४ धरणांमध्ये केवळ १८ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 14:34 IST

दमदार पावसाअभावी धरणांच्या पाणीपातळीत अद्यापपर्यंत अपेक्षित वाढ झालेली नाही.

ठळक मुद्देसोनल प्रकल्पात जेमतेम ७.९९ टक्के जलसाठा गोळा झाला आहे. १६ लघूप्रकल्पांमध्ये १९.९३ असा सरासरी २०.४१ टक्के जलसाठा झाला आहे.रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी पुरविणे कदापि शक्य होणार नाही.

वाशिम : चालूवर्षीच्या पावसाळ्यात रिमझिम स्वरूपात का होईना पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांची स्थिती समाधानकारक आहे; मात्र दमदार पावसाअभावी धरणांच्या पाणीपातळीत अद्यापपर्यंत अपेक्षित वाढ झालेली नाही. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील लघू व मध्यम अशा एकंदरित १३४ धरणांमध्ये केवळ १८.८६ टक्के जलसाठा गोळा झाला आहे. यात वाशिमच्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पात ४१.८५, मालेगाव तालुक्यातील सोनलमध्ये १३.८९; तर कारंजा तालुक्यातील सोनल प्रकल्पात जेमतेम ७.९९ टक्के जलसाठा गोळा झाला आहे. याशिवाय वाशिम तालुक्यातील ३५ लघूप्रकल्पांमध्ये आजरोजी ३५.६३, मालेगाव तालुक्यातील २३ प्रकल्पांमध्ये १५.२८, रिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांमध्ये १४.१४, मंगरूळपीर तालुक्यातील १५ प्रकल्पांमध्ये १०.३५, मानोरा तालुक्यातील २४ प्रकल्पांमध्ये १६.०३; तर कारंजा तालुक्यातील १६ लघूप्रकल्पांमध्ये १९.९३ असा सरासरी २०.४१ टक्के जलसाठा झाला आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांमध्ये संततधार तथा मोठ्या स्वरूपातील पावसाने हजेरी न लावल्यास आणि धरणे तुडूंब न भरल्यास आगामी रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी पुरविणे कदापि शक्य होणार नाही. यासोबतच पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :washimवाशिमDamधरण