शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

शेतकरी गटांसाठी मंजूर निधीच्या १५ टक्केच रक्कम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 17:42 IST

निवड केलेल्या शेतकरी बचत गटांना पुढील कामे करण्यासाठी केवळ १६.५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

वाशिम : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर मंजूर निधीच्या ३३ टक्के मर्यादेत निधी वितरीत करण्याचे धोरण वित्त विभागाने अवलंबिले आहे. दुसरीकडे गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे’ या योजनेसाठी मात्र मंजूर निधीच्या १५ टक्के रक्कम देण्यास २४ आॅगस्ट रोजी मंजूरी दिली. २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षात निवड केलेल्या शेतकरी बचत गटांना पुढील कामे करण्यासाठी केवळ १६.५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील शेती उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी सामुहिक शेती, शेती करण्याची आधुनिक पद्धती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता लक्षात घेऊन २०१७-१८ पासून राज्यात ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना देणे’ ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यात सन २०१७-१८ मध्ये १९६ शेतकरी गट व २०१८-१९ मध्ये २११ शेतकरी बचत गटांची निवड झाली. पहिल्या टप्प्यात या बचत गटांना प्रशिक्षण, सिंचन सुविधा, यांत्रिकीकरण, काढणीपश्चात तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पणन यासह अन्य कामांसाठी निधी पुरविण्यात आला. उर्वरीत कामे करण्यासाठी २०२०-२१ मध्ये, मंजूर निधीच्या ३३ टक्केच्या मर्यादेत निधी वितरणास मंजूरी देण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने वित्त विभागाकडे सादर केला. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर मंजूर निधीच्या १५ टक्के निधी वितरणास वित्त विभागाने हिरवी झेंडी दिली.त्यानुसार ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना देणे’ या योजनेंतर्गत आता १६.५० कोटी निधी मिळणार आहे. सन २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षात निवड झालेल्या शेतकरी गटांना त्यांच्या प्रकल्प आराखड्यानुसार पुढील कामे या निधीतून करावी लागणार आहेत. यामध्ये अमरावती विभागातील जवळपास १७ गटांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र