शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दीड लाखावरील भरलेली रक्कम शासन करणार परत : आमदार पाटणी यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 16:21 IST

वाशिम :   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कुटुंबाच्या एकुण थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड लाभासाठी भरलेली दीड लाखवरील रक्कम शासनाच्यावतीने परत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली आहे.

ठळक मुद्देयापुर्वी प्रती कुटुंब दीड लाख मयार्देपर्यंत कर्जमाफीचा लाभ अनुज्ञेय होता.यापुढे अर्जदार कुटुंबातील प्रत्येक पात्र कर्जदार सदस्यास दीड लाखापर्यंत  कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.परतफेड लाभासाठी भरलेली दीड लाखवरील रक्कम शासनाच्यावतीने परत करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कुटुंबाच्या एकुण थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड लाभासाठी भरलेली दीड लाखवरील रक्कम शासनाच्यावतीने परत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली आहे. १० आॅगष्ट २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.      योजनेच्या प्रचलित निकषानुसार कुटुंबाच्या सर्व कर्जदार सदस्यांच्या पात्र कर्जखात्यांची एकुण थकबाकी दीड लाखापेक्षा जास्त आहे , अशा अर्जदार कुटुंबातील पात्र सदस्यांनी दीड लाखावरील रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यास त्यांना शासनाच्यावतीने प्रती कुटुंब दीड लाख मयार्देपर्यंत लाभ देण्यात येत होता. सोबतच्या शासन निर्णयान्वये सुधारित बदलानुसार कर्जमाफीबाबतच्या इतर निकषास अधिन राहुन यापुर्वीच्या प्रती कुटुंब दीड लाखापर्यंत कर्जमाफीच्या लाभाऐवजी यापुढे अर्जदार कुटुंबातील प्रत्येक पात्र कर्जदार सदस्यास दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. सदर बदलामुळे यापुर्वी लाभार्थ्यांच्या याद्या निश्चित करतांना करण्यात आलेल्या लाभाच्या गणनेत बदल करण्यात येऊन कुटुंबातील प्रत्येक पात्र सदस्यांच्या वैयक्तिक कर्जखात्यांच्या थकबाकीची पुनर्गणना करण्यात येणार आहे. प्रत्येक सदस्यांस दीड लाखापर्यंंत कर्जमाफी, एकरकमी कर्जपरत फेड योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पुनर्गणनेव्दारे लाभाचे निश्चितीकरण केल्यानंतर कुटुंबातील वैयक्तीक कर्जदार सदस्यांची पात्र थकबादीची रक्कम दीड लाखापेक्षा कमी असल्यास अशा परिस्थितीत योजनेच्या यापुर्वीच्या निकषानुसार कुटुंबाच्या एकुण थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड योजनेच्या लाभासाठी भरलेली दीड लाखावरील रक्कम शासनाच्यावतीने परत करण्यात येईल. तसेच बदललेल्या निकषानुसार कर्जदार वैयक्तीक सदस्यांची थकबाकीची रक्कम दीड लाखाच्या आत असल्यास आणि लागु असेल तेथे अशा सदस्यांकडील पुनर्गठीत कर्जाची उर्वरित हप्त्यांच्या देय असलेल्या रकमेसह दीड लाख या मयार्देपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची माहितीही आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली. 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीRajendra Patniराजेंद्र पाटणी