शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

जलशुद्धीकरणात दीड  कोटी लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 15:12 IST

जलशुध्दीकरणामुळे ५० ते ७० टक्के पाणी वाया जाते.  या प्रकल्पातुन वाया जाणाºया पाण्याची गणना लिटर्स मध्ये केली असता तालुक्यात सुरू असलेल्या प्रकल्पातून दीड कोटी लिटर्स पाणी वाया जात आहे.

-  दिवाकर इंगोले लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  जल शुद्धीकरण व जलशीतलीकरण या नादात सत्तर टक्के जल अपव्यय होत आहे. असे जलशुद्धीकरण प्रकल्पाची संख्या शहर व ग्रामीण भागासह १५० अशी आहे. या प्रकल्पातून सत्तर टक्के पाणी वाया जात आहे. म्हणजे एक ग्लास शुद्ध व थंड पाणी पिण्यासाठी चार ग्लास पाणी वाया जाते. पाणी टंचाईच्या काळात हे अपव्यय अतिशय गंभीर असून मुख्याधिकारी, तहसीलदार,उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांनी या प्रकाराची दखल घेऊन जलपूर्णभरण प्रकिया राबविणे आवश्यक आहे.पाण्याचे भीषण संकट टाळण्यासाठी जल ही राष्टीय संपत्ती घोषित झाल्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळन्यासाठी सक्तीची कार्यवाहि करणे आवश्यक आहे. कारंजा तालुक्यात ९१ ग्राम पंचायती असून त्या अंतर्गत १३४ गावे आहेत. शहरात ३२ व ग्रामीण विभागात १२८ जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. त्यामुळे ग्रामीण व नागरी परिसरात शुभकार्य प्रसंगी हेच पाणी वापरले जाते. तालुक्यातील सर्व तुष्णातुप्ती केंद्र व व्यापार व्यवसाय प्रतिष्ठाने, औद्योगिकीकरण संस्था, तसेच शासकीय कार्यालय, अशासकीय कार्यालय,घरगुती  उपयोगाकरिता याच पाण्याचा वापर होतो त्यामुळे या पाण्याची मागणी वाढली आहे.      परंतु ही मागणी पूर्ण करताना जलशुध्दीकरणामुळे ५० ते ७० टक्के पाणी वाया जाते.  या प्रकल्पातुन वाया जाणाºया पाण्याची गणना लिटर्स मध्ये केली असता तालुक्यात सुरू असलेल्या प्रकल्पातून दीड कोटी लिटर्स पाणी वाया जात आहे.या वाया जाणाºया पाण्याचे सक्तीचे जलपूर्णर्भरण करून, हेपाणी पुन्हा जमिनीच्या उदरात सोडता येईल. तसेच दुष्काळग्रस्त भीषण पाणी टंचाई असलेल्या गावामध्ये  या पाण्याचा उपयोग पेय जल सोडून मुके पाणी व ईतर वापरासाठी उपयोगात आणता येईल. प्रशासनाने प्रत्येक प्रकल्प धारकांसाठी वाया जाणा?्या पाण्यासाठी टाके बांधाने शक्तीचे करावे. त्या टाक्यातून पाणी प्रशासनाने टँकर व्दारे उचल करून या पाण्याचा वापर दुष्काळी गावात पिण्याचे पाणी वगळून इतर वापरासाठी उपयोग  करावा. जलशुद्धीकरनाच्या नावावर तालुक्यात दीड  कोटी पाण्याचा अपव्यय प्रशासनाने दखल घेतल्यास दुष्काळग्रस्त गावाला पाणी पुरवठा होऊ शकतो व वाया जाणारे पाण्याचे नियोजनही योग्यरित्या केल्या जावू शकते, याकरिता पुढाकाराची गरज आहे एवढे मात्र नक्की! वाया जाणारे पाणी जनावरांसाठी     वाया जाणाºया पाण्याबाबत आम्ही  गंभीर असून परिसरातील लोकांना जनावारासाठी व वापरासाठी पाणी विनामूल्य उपलब्ध करून देत असल्याचे एम कुलचे संचालक जुनेद मराछिया यांनी सांगितले. असाच प्रयोग सर्वांनी केला तर अपव्यय होणाºया पाण्याचा सदुपयोग होईल. कारंजा शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करून जलपूर्णर्भरण प्रकिया सक्तीचे करण्यात येईल. - डॉ अजय कुरवाडे, मुख्याधिकारी नगर परिषद कारंजा,आरोग्याच्या दृष्टीने पाण्याचे शुद्धीकरण महत्वाचे असले तरी वाया जाणाºया पाण्याचा सदुपयोग कसा करता येईल यांचे प्रशासनाने उचित नियोजन करणे गरजेचे आहे. - डॉ निलेश हेडा, पर्यावरण तज्ज्ञ कारंजा जलशुद्धीकरण करतांना पाण्याचा अपव्यय ही गंभीर बाब असून यांचे जलव्यवस्थापणाव्दारे नियंत्रण व्हायला हवे.- अ‍ॅड . विजय बगडे,  माजी नगराध्यक्ष कारंजा

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईKaranjaकारंजा