शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा उच्छाद वनविभागाच्या नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 14:09 IST

पिकांची मोठी हानी होत असतानाच शेतकरी, शेतमजुरांचा जीवही धोक्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत जंगलात चाऱ्याची उपलब्धता नाही. त्यामुळे वन्यप्राणी शेतशिवार आणि लोकवस्तीत धाव घेत आहेत. यात पिकांची मोठी हानी होत असतानाच शेतकरी, शेतमजुरांचा जीवही धोक्यात येत आहे. तथापि, तोकडा निधी, जटील अटीमुळे वनविभागालाही या प्रकारावर नियंत्रण मिळविणे अशक्य झाले आहे. वनपरिक्षेत्रातील प्राण्यांना रोखण्यासाठी लावलेले कुंपणही तकलादू आहेत. त्यामुळेच वनविभागाकडे पिकहानीसह मनुष्यहानीबाबत दाखल होणाºया प्रस्तावांची संख्या वाढतच आहे.जिल्ह्यात वाशिम वनविभागांतर्गत वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव असे चार वनपरिक्षेत्र असून ४१ हजार ९७१.६६ हेक्टर जमिनीवर प्रादेशिक वन परिक्षेत्राचा विस्तार आहे. या प्रादेशिक वनपरिक्षेत्रात हरीण, काळविट, निलगाय, माकड, भेकर, रानडुक्कर, अस्वल, तरस, बिबट, ससा, कोल्हा, रानमांजर, सायाळ आदि वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. आता वाशिम जिल्ह्यातील वनक्षेत्रात वाढ झालेली नसली तरी, वन्यप्राण्यांच्या संख्येत खुप वाढ झाली आहे. मर्यादीत असलेल्या वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यासाठी चारा, पाण्याची सोय नसल्याने हे प्राणी लोकवस्ती आणि शेतशिवारात धाव घेत आहेत. त्यामुळे पिक नुकसानाच्या घटनांसह पाळीव प्राण्यांसह मानवावरही या प्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. या प्राण्यांना लोकवस्तीपासून दूर आणि वनपरिक्षेत्रातच राहण्यास बाध्य करण्यासाठी वनविभागाकडून पुरेसे प्रयत्न होत नाहीत. प्रत्यक्षात मर्यादत निधी आणि जटील अटींमुळे वनविभागाच्या प्रयत्नांवरही मर्यादा येत आहेत. वन्यप्राण्यांवर नियंत्रणासाठी वनपरिक्षेत्रालगत कुंपण बांधण्यासह मोठे खंदक खोदण्याची जबाबदारी वनविभागाकडे आहे; परंतु सोहळ काळविट अभयारण्यातील काही भाग आणि काटेपूर्णा अभयारण्यातील काही भाग वगळता इतर कोठेही कुंपण वा खंदक खोदण्यात आलेले नाहीत. त्यातही सोहळ काळविट अभयारण्यातील कुंपण हे तकलादू असल्याने त्याची पार दैना झाली आहे. पीक नुकसानाच्या प्रकारांत वाढवाशिम जिल्ह्यात जानेवारी ते मे दरम्यानचा काळ सोडला, तर इतर सर्वच महिन्यात शेतशिवारात पिके उभी असतात. याच पिकांवर रानडुक्कर, माकडे, निलगाई आणि हरणांचे कळप ताव मारून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करतात. यंदा जुन महिन्यापासून आजवर अवघ्या अडिच महिन्यांतच पीक नुकसान झाल्यामुळे वनविभागाकडे तब्बल २९४ प्रस्ताव दाखल झाले आहेत. या प्रकरणांना मंजुरीही देण्यात आली आहे. तथापि, या नुकसानातील भरपाईचे प्रमाण नगण्य असल्याने सर्व शेतकºयांना मिळून केवळ ५ लाख ८६ हजार रुपये मिळाले आहेत. वन्यप्राण्यांच्या मानवावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून, चार महिन्यांत ६ लोक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. तर सहा पाळीव प्राण्यांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेला आहे.

बिबट्याचा संचारही वाढलावाशिम जिल्ह्यांतर्गत येणाºया वनपरिक्षेत्रांतर्गत बिबट्याचे अस्तित्व असून, या हिंस्त्रप्राण्याचाही शेतशिवारात संचार वाढल्याचे दिसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव, कारंजा तालुक्यातील एका गावासह मालेगाव तालुक्यात बिबट्याचे वारंवार दर्शन शेतकरी शेतमजुरांना घडत आहे. मालेगाव तालुक्यात किन्हीराजा ते कवरदरी या मार्गावरील बाबनदरीच्या घाटात बिबट्याने रोहीची शिकार करून ठार मारल्याची घटना ४ आॅगस्ट रोजी घडली. यामुळे बिबट्याच्या भितीने किन्हीराजासह या मार्गावरील कवरदरी, पिंपळशेंडा, वाडी रामराव आदी गावांमधील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनपरिक्षेत्राच्या तुलनेत वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. हे वन्यप्राणी जंगलातच थांबावेत म्हणून वनपरिक्षेत्रालगत खंदक खोदणे, कुंपण उभारणे आदि कामे करता येतात; परंतु यापुढे शेतशिवारातील वन्यप्राण्यांचा संचार रोखण्यासाठी कुठलीही उपाय योजना आम्हाला करणे शक्य नाही आणि त्याच्या काही सुचनाही नाहीत. पीक नुकसान किं वा मनुष्यहानीबाबत दाखल प्रस्तावांना निर्धारित निकषानुसार मदत केली जाते.-किशोर येळे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू)प्रादेशिक वनविभाग वाशिम

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीवforest departmentवनविभागagricultureशेतीFarmerशेतकरी