शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

आता सरकारचा बंदोबस्त शेतकरीच करतील - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:17 IST

मिसाळ यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात संबंध महाराष्ट्रातील  शेतक-यांचे दु:ख सांगितले आहे. तरीही या सरकारला जाग येत नसेल तर  सरकारचा बंदोबस्त शेतकरीच करतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सरकारला दिला.

ठळक मुद्देमानोरा येथे पत्रकार परिषदसोयजना येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सांत्वन

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा (वाशिम): सोयजना येथील ज्ञानेश्वर मिसाळ या शेतक-याने  सरकारातील मंत्र्याला भेटुन, त्यांना सांगून आत्महत्या केली; मात्र मंत्र्यांनी त्यांची टिंगल टवाळी केली. त्यांना आत्महत्येपासून रोखले नाही किंवा त्यांना लढण्याचे बळ दिले नाही. त्यामुळे सरकारच्या त्या मंत्र्यांविरुध्द गुन्हे दाखल झाले पाहिजे. मिसाळ यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात संबंध महाराष्ट्रातील  शेतक-यांचे दु:ख सांगितले आहे. तरीही या सरकारला जाग येत नसेल तर  सरकारचा बंदोबस्त शेतकरीच करतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सरकारला दिला.

रविकांत तुपकर यांनी मानोरा तालुक्यातील सोयजना येथे रविवारी मृतक शेतकरी ज्ञानेश्वर मिसाळ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.त्यानंतर मानोरा येथील विश्राम भवनावर पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतक-यांच्या पाठीशी आहे. विदर्भात संघटनेच्यावतीने  मोठे आंदोलन उभारले जाईल. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शेतक-यांना एकत्र केले जाईल व व्यवस्थेशी लढा देण्यात येईल. शेतक-यांनी मागच्या सरकारला सत्तेपासून दूर ठेवुन भाजपाचे  सरकार सत्तेत आणले, मात्र  मागच्या पेक्षाही हे सरकार शेतक-यांच्या बाबतीत पुढे गेले. कोणताच न्याय दिला नाही. कर्जमाफी फसवी असून, शेतकºयांच्या बायकांचे अंगठ्यांचे ठसे घेतले. मात्र उद्योगपतींनी कर्ज काढले तेव्हा त्यांच्या बायका कुठे आॅनलाईन कर्जमाफीसाठी रांगेत दिसल्या नाही. हे सरकार उद्योगधार्जीने आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. बोंडअळीमुळे कपाशी संपली. मोसेस कंपनीवर साधी कारवाई झाली नाही. म्हणून सरकारने  या सर्व शेतकºयांना नुकसान भरपाई सरसकट दिली पाहिजे, देशातील  कर्नाटक राज्यात सोयाबीनला जास्त भाव आहे, राज्यात मो.का नाही,  महाराष्ट्र हा पाकीस्तानमध्ये आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या सरकारला छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, आत्महत्याग्रस्त मिसाळ कुटूंबातील  एका मुलाला सरकारने नोकरी द्यावी, आत्महत्या करणाºया शेतक-यांना कुटूंबाला ५ लाख रुपये मदत द्यावी. सोयाबीन , कपाशी उत्पादक शेतक-यांना सरसकट अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली. आता शेतक-यांनी आत्महत्या  करु नये, परिस्थिती तशी आली तर स्वाभीमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी राहिल. आता लढाई करुन मरा व राज्यकर्त्यांना हिसका दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले, तालुका शिवसेना  प्रमुख रवि पवार, डॉ.विठ्ठलराव घाटगे,  शाम पवार, आकाश गाढव, स्वप्नील धनकर, डॉ.दिपक करसडे आदि उपस्थित होते. 

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरfarmer suicideशेतकरी आत्महत्याwashimवाशिम