शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

महानगरातून आलेल्या नागरिकांना बजावल्या नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:48 IST

महानगरातून आलेल्या नागरिकांना बाहेर न निघता घरातच राहण्यासंदर्भात स्थानिक ग्राम समितीच्यावतीने २ एप्रिल रोजी नोटीस देण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंगळा : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरातून आलेल्या नागरिकांना बाहेर न निघता घरातच राहण्यासंदर्भात स्थानिक ग्राम समितीच्यावतीने २ एप्रिल रोजी नोटीस देण्यात आल्या. घरात न राहिल्यास कलम १४४ नुसार संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत असल्याने विविध कारणास्तव विदेशात, परराज्यात, महानगरात गेलेले नागरिक गत १५ दिवसांत जिल्ह्यात परतले आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून या नागरिकांची माहिती संकलन करणे, आरोग्य तपासणी करणे आणि १४ दिवस घरातच राहणे याबाबत स्थानिक ग्राम समितीच्यावतीने कार्यवाही केली जात आहे. जिल्ह्यात रोजगारांचे स्त्रोत अपुरे असल्याने प्रामुख्याने शेती कामांवरच जिल्ह्यातील बहुतांश जनतेच्या संसाराचा गाडा चालतो. त्यातही जिल्ह्यात प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक असल्याने खरीप हंगामानंतरच जिल्हाभरातील कामगार रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे, नाशिक आदी महानगरांसह गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेशात जातात. ते आता परत येत असून, त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. महानगरातून मुंगळा परिसरात जवळपास ३० ते ४० नागरिक परत आले असून, सावधगिरीचा उपाय म्हणून या सर्वांच्या घरी जाऊन ग्राम समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. पुढील १४ दिवस घरातच राहावे, कोणत्याही कामानिमित्त घराबाहेर पडू नये अन्यथा नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल असा इशारा ग्रामसमिती व ग्रामपंचायतने दिला. यावेळी सरपंच सिंधुबाई पवार, उपसरपंच गजानन केळे, पोलीस पाटील केशव गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी भीमराव वानखडे, विठ्ठल केळे, किशोर ठाकरे, गाव कामगार ओम राऊत आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस