शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटीस; 'स्वाभिमानी'ने नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 15:06 IST

केशवनगर येथे १२ मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला आरती ओवाळून या प्रकाराचा निषेध नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) - रिसोड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर झालेला असतानाही, बँकांकडून शेतकºयांना कर्जवसुलीचा तगादा सुरू झाला आहे. कर्ज वसुलीच्या नोटीस शेतकºयांना मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. दरम्यान, केशवनगर येथे १२ मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला आरती ओवाळून या प्रकाराचा निषेध नोंदविला.गतवर्षी रिसोड तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न पडल्याने तसेच अन्य निकषात तालुका बसल्याने शासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर केलेला आहे. त्यामुळे या तालुक्यात दुष्काळी सवलती लागू झालेल्या आहेत. असे असताना आता एसबीआय शाखा मसला पेनच्यावतीने शेतकºयांना कर्जाच्या वसुलीची नोटीस देण्यात आली. नंदकिशोर कुंडलिक तहकीक या शेतकºयाला कर्ज वसुलीची नोटीस आली तसेच गारपिटीची जमा झालेली रक्कम असो की दुष्काळ मदत निधीची रक्कम असो, त्या खात्याला ‘होल्ड’ लागला, असे शेतकºयाला सांगण्यात आले. त्यामुळे कर्ज वसुलीच्या नोटीस तत्काळ थांबविण्यात यावा, गारपिट किंवा अन्य मदत निधीची मिळालेली रक्कम संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यातून परस्पर वळती करू नये, अशी मागणी शेतकरी स्वाभिमानी संघटनेने केली. या मागणीच्या अनुषंगाने केशवनगर येथे मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला आरती ओवाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्यासह पदाधिकाºयांनी निषेध नोंदविला.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना