शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ३२ प्रकल्पांत ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:21 IST

जिल्ह्यातील ३२ प्रकल्पांत अद्याप एक टक्काही उपयुक्त जलसाठा झालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी, जिल्ह्यातील ३२ प्रकल्पांत अद्याप एक टक्काही उपयुक्त जलसाठा झालेला नाही. त्यात वाशिम आणि मंगरुळपीर तालुक्यातील अधिकाधिक प्रकल्पांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात १ जून ते ९ जुलैदरम्यान वार्षिक सरासरीच्या ३७.४२ टक्के पाऊस पडला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकबुर्जी, सोनल आणि अडाण प्रकल्पांच्या पातळीत समाधानकारक वाढ झाल्याने या प्रकल्पांवरील पाणी पुरवठा योजनांना तूर्तास तरी अडचण नसल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात गत दोन वर्षांत पावसाचे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी झाले. परिणामी प्रकल्पांत पुरेसा साठा झाला नाही. त्यात २०१८ मध्ये अपुऱ्या पावसामुळे ५०० पेक्षा अधिक गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. गतवर्षी जिल्ह्यात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे प्रल्कल्पांतील पातळीत वाढ झाली. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट टळले. आता यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे प्रकल्पांतील पातळी वाढण्याची शक्यता होती; परंतु ९ जुलैपर्यंतही जिल्ह्यातील ३२ प्रकल्पांची पातळी शुन्यावरच आहे. त्यात वाशिम तालुक्यातील एकूण ३६ प्रकल्पांपैकी १० बॅरेज आणि ७ लघू प्रकल्प मिळून १७ प्रकल्प, मंगरुळपीर तालुक्यातील १५ पैकी ५ प्रकल्प, कारंजा तालुक्यातील १६ पैकी चार प्रकल्प, मानोरा तालुक्यातील २५ पैकी ३ प्रकल्प, व मालेगाव तालुक्यातील २३ प्रत्येकी दोन प्रकल्प, तर रिसोड तालुक्यातील १८ पैकी एकाप्रकल्पाची अद्यापही शुन्यावरच आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ३२ प्रकल्पांची पातळी शुन्यावर असताना, २४ प्रकल्पांची पातळी ५० टक्क्यांवर आहे, तर उर्वरित ८० प्रकल्पांची पातळी ५० टक्क्यांपेक्षा खाली असून, त्यातील २३ प्रकल्पांतही अद्याप १० टक्के उपयुक्त साठा झालेला नाही. अर्थात जिल्ह्यातील १३६ पैकी ५५ प्रकल्पांची स्थिती महिनाभराच्या पावसानंतरही गंभीर असून, पुढील तीन महिन्यांत पडणाºया पावसावरच या प्रकल्पांच्या पातळीतील वाढ अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास या प्रकल्पांत पुरेसा जलसाठा होणार नाही. अशात संबंधित प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजना अडचणीत येणार आहेत. शिवाय यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळण्याची शक्यताही कमीच राहणार असल्याची भीती आहे.

२४ प्रकल्पांत ५० टक्क्यांवर साठाजिल्ह्यातील १३६ प्र्रकल्पांत मिळून १० जुलै रोजी सरासरी ३५.८० टक्के उपयुक्त साठा असला तरी, यातील २४ लघू प्रकल्पांसह दोन मध्यम प्रकल्पांतील वाढलेल्या पातळीमुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पातळीत ही वाढ दिसत आहे. जिल्ह्यातील २४ लघू प्रकल्पांत सद्यस्थितीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक साठा असून, कारंजा तालुक्यातील अडाण व मालेगाव तालुक्यातील सोनल या दोन मध्यम प्रकल्पांतही ५० टक्क्यांहून अधिक उपयुक्त साठा आहे. वाशिम तालुक्यातील एकबुर्जी मध्यम प्रकल्पात मात्र सद्यस्थितीत ४०.५२ टक्केच साठा झाला आहे.

 

टॅग्स :washimवाशिमDamधरण