शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

जलयुक्त, रस्ते, पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी निधीची तरतूद निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 15:32 IST

महत्वपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीसाठी लागणाºया निधीची कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही.

- सुनील काकडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विद्यमान शासनाने जलयुक्त शिवार अभियान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यासह पाणीपुरवठा योजनांची कामे पुढे चालू ठेवण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनास कुठलेही ठोस निर्देश दिलेले नाहीत. परिणामी, २०२०-२१ मधील कामांसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करित असताना जिल्हा नियोजन समितीकडून महत्वपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीसाठी लागणाºया निधीची कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही. यामुळे विकासकामे प्रभावित होणार असून नागरिकांमधून याप्रती नाराजीचा सूर उमटत आहे.जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ ते २०१८-१९ या पाच वर्षात जलसंधारणाच्या प्रस्तावित ११ हजार ८८५ पैकी ११ हजार ५४९ कामे पूर्ण झाली. त्यासाठी मंजूर २८२.७१ कोटी निधीपैकी २१९.३१ कोटी रुपयांचा खर्च झाला. यामाध्यमातून हजारो हेक्टरवरील पिकांना कायमस्वरूपी सिंचनाची प्रभावी सोय उपलब्ध झाली आहे. असे असताना २०१९-२० मध्ये जलयुक्त शिवार अभियानासाठी शासनाकडून छदामही मंजूर झाला नाही. त्यामुळे या वर्षात जलसंधारणाची कुठलीच कामे होऊ शकली नाहीत. आता तर ही योजनाच गुंडाळण्यात आल्याने २०२०-२१ मध्येही जलसंधारणाचे एकही काम जिल्ह्यात होणार नसल्याची एकूण स्थिती आहे. यासोबतच राज्यशासनाचे कुठलेही स्पष्ट निर्देश नसल्याने ग्रामीण भागात नळाव्दारे पाणीपुरवठा करण्याची योजनाही ठप्प झाली आहे. २०२०-२१ या वर्षांत जिल्हा नियोजन समितीव्दारे या योजनेकरिता कुठलीच आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्त्यांचे जाळे निर्माण करणाºया मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचीही अशीच चिंताजनक अवस्था झाली असून २०२०-२१ मध्ये ही योजना राबविण्याकरिता देखील जिल्हा नियोजन समितीकडून आर्थिक तरतूद निरंक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे जलसंधारणाच्या महत्वाकांक्षी कामांना खीळ बसण्यासोबतच ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे ठप्प झाली आहेत. पाणीपुरवठा योजना अंमलबजावणी थांबल्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न देखील गंभीर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.वाशिम जिल्ह्यातील अधिकांश शेतजमीन ही कोरडवाहू असून सिंचनाची सुविधा तुलनेने मर्यादित स्वरूपात आहे. जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या विविध कामांमुळे मात्र पिकांना पाणी मिळायला लागले. ही योजनाच आता गुंडाळल्याने पुन्हा समस्या जाणवणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांची कामे आणि पाणीपुरवठा योजनाही ठप्प असून विकासाचा बोजवारा उडत आहे.- राजेंद्र पाटणीआमदार, कारंजा मतदारसंघ

जलयुक्त शिवार अभियानाची मुदत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत होती. त्यानंतर ही योजना पुढे राबविण्यासंदर्भात शासनाकडून कुठलेही निर्देश अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे ‘डीपीडीसी’तून योजनेसाठी आर्थिक तरतूद झालेली नाही. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना पुढे सुरू ठेवण्यासंदर्भातही सुस्पष्ट सूचना शासनाकडून मिळालेल्या नाहीत. ग्रामीण भागात नळाव्दारे पाणीपुरवठा योजना ही केंद्र शासनाकडून राबविण्यात येते. त्यासाठी राज्य शासनाचे निर्देश मिळत नाहीत, तोपर्यंत डीपीडीसीतून कुठलीही आर्थिक तरतूद करू नये, अशा शासनाच्या सूचना असल्याने या योजनेसाठी देखील २०२०-२१ साठी तरतूद करण्यात आलेली नाही. तथापि, शासनाचे निर्देश मिळाल्यास तीनही योजनांसाठी डीपीडीसीतून विनाविलंब आर्थिक तदतूद करण्यात येईल.- हृषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवार