शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

जलयुक्त, रस्ते, पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी निधीची तरतूद निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 15:32 IST

महत्वपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीसाठी लागणाºया निधीची कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही.

- सुनील काकडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विद्यमान शासनाने जलयुक्त शिवार अभियान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यासह पाणीपुरवठा योजनांची कामे पुढे चालू ठेवण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनास कुठलेही ठोस निर्देश दिलेले नाहीत. परिणामी, २०२०-२१ मधील कामांसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करित असताना जिल्हा नियोजन समितीकडून महत्वपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीसाठी लागणाºया निधीची कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही. यामुळे विकासकामे प्रभावित होणार असून नागरिकांमधून याप्रती नाराजीचा सूर उमटत आहे.जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ ते २०१८-१९ या पाच वर्षात जलसंधारणाच्या प्रस्तावित ११ हजार ८८५ पैकी ११ हजार ५४९ कामे पूर्ण झाली. त्यासाठी मंजूर २८२.७१ कोटी निधीपैकी २१९.३१ कोटी रुपयांचा खर्च झाला. यामाध्यमातून हजारो हेक्टरवरील पिकांना कायमस्वरूपी सिंचनाची प्रभावी सोय उपलब्ध झाली आहे. असे असताना २०१९-२० मध्ये जलयुक्त शिवार अभियानासाठी शासनाकडून छदामही मंजूर झाला नाही. त्यामुळे या वर्षात जलसंधारणाची कुठलीच कामे होऊ शकली नाहीत. आता तर ही योजनाच गुंडाळण्यात आल्याने २०२०-२१ मध्येही जलसंधारणाचे एकही काम जिल्ह्यात होणार नसल्याची एकूण स्थिती आहे. यासोबतच राज्यशासनाचे कुठलेही स्पष्ट निर्देश नसल्याने ग्रामीण भागात नळाव्दारे पाणीपुरवठा करण्याची योजनाही ठप्प झाली आहे. २०२०-२१ या वर्षांत जिल्हा नियोजन समितीव्दारे या योजनेकरिता कुठलीच आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्त्यांचे जाळे निर्माण करणाºया मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचीही अशीच चिंताजनक अवस्था झाली असून २०२०-२१ मध्ये ही योजना राबविण्याकरिता देखील जिल्हा नियोजन समितीकडून आर्थिक तरतूद निरंक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे जलसंधारणाच्या महत्वाकांक्षी कामांना खीळ बसण्यासोबतच ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे ठप्प झाली आहेत. पाणीपुरवठा योजना अंमलबजावणी थांबल्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न देखील गंभीर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.वाशिम जिल्ह्यातील अधिकांश शेतजमीन ही कोरडवाहू असून सिंचनाची सुविधा तुलनेने मर्यादित स्वरूपात आहे. जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या विविध कामांमुळे मात्र पिकांना पाणी मिळायला लागले. ही योजनाच आता गुंडाळल्याने पुन्हा समस्या जाणवणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांची कामे आणि पाणीपुरवठा योजनाही ठप्प असून विकासाचा बोजवारा उडत आहे.- राजेंद्र पाटणीआमदार, कारंजा मतदारसंघ

जलयुक्त शिवार अभियानाची मुदत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत होती. त्यानंतर ही योजना पुढे राबविण्यासंदर्भात शासनाकडून कुठलेही निर्देश अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे ‘डीपीडीसी’तून योजनेसाठी आर्थिक तरतूद झालेली नाही. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना पुढे सुरू ठेवण्यासंदर्भातही सुस्पष्ट सूचना शासनाकडून मिळालेल्या नाहीत. ग्रामीण भागात नळाव्दारे पाणीपुरवठा योजना ही केंद्र शासनाकडून राबविण्यात येते. त्यासाठी राज्य शासनाचे निर्देश मिळत नाहीत, तोपर्यंत डीपीडीसीतून कुठलीही आर्थिक तरतूद करू नये, अशा शासनाच्या सूचना असल्याने या योजनेसाठी देखील २०२०-२१ साठी तरतूद करण्यात आलेली नाही. तथापि, शासनाचे निर्देश मिळाल्यास तीनही योजनांसाठी डीपीडीसीतून विनाविलंब आर्थिक तदतूद करण्यात येईल.- हृषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवार