शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

रिसोड तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण : चारा व पाणीटंचाई गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:42 IST

रिसोड - रिसोड तालुक्यात चारा व पाणीटंचाई गंभीर बनत असून, याचा जबर फटका पशुपालकांना बसत आहे. तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण असून, उर्वरीत आठ प्रकल्पांत सरासरी १४ टक्के जलसाठा आहे. 

ठळक मुद्दे तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण असून, उर्वरीत आठ प्रकल्पांत सरासरी १४ टक्के जलसाठा आहे. आता पाणीटंचाई तीव्र बनत असून, याचा फटका पशुपालकांना बसत आहे. चाराटंचाईदेखील निर्माण झाली.काही गावातील विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता कोणत्याच ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याचे दिसून येते.

रिसोड तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण : चारा व पाणीटंचाई गंभीर 

रिसोड - रिसोड तालुक्यात चारा व पाणीटंचाई गंभीर बनत असून, याचा जबर फटका पशुपालकांना बसत आहे. तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण असून, उर्वरीत आठ प्रकल्पांत सरासरी १४ टक्के जलसाठा आहे. 

रिसोड तालुक्यात एकूण १७ प्रकल्प आहे. सन २०१७ मध्ये पावसाने सरासरी गाठली नव्हती. त्यामुळे प्रकल्पांत पुरेशा प्रमाणात जलसाठा होऊ शकला नाही. विहिरी व बोअरवेलची जलपातळीदेखील समाधानकारक नव्हती. आता पाणीटंचाई तीव्र बनत असून, याचा फटका पशुपालकांना बसत आहे. चाराटंचाईदेखील निर्माण झाली असून, चाºयाच्या किंमती वाढत असल्याचे दिसून येते. चारा व पाणीटंचाईचे भावी संकट पाहून काही पशुपालकांनी तर पशूधन विक्रीला काढल्याचे दिसून येते. पाण्यासाठी जनावरांची भटकंती सुरू आहे. प्रकल्पही तळ गाठत असल्याने पशुपालकांची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. तालुक्यातील बोरखेडी प्रकल्प, गणेशपूर, हराळ, कोयाळी, मांडवा, धोडप, मोरगव्हाण, पाचंबा, वाघी असे नऊ प्रकल्प कोरडेठण्ण आहेत. कोयाळी प्रकल्पात २७ टक्के, नेतन्सा प्रकल्पात १९ टक्के, गौंढाळा प्रकल्पात २७ टक्के, जवळा प्रकल्पात १ टक्के, वरूड बॅरेज २३ टक्के, वाडी रायताळ प्रकल्पात ५४ टक्के, कुकसा प्रकल्पात ३४ टक्के, वाकद प्रकल्पात दोन टक्के असा जलसाठा आहे. सरासरी १४ टक्के जलसाठा असून, येत्या काही दिवसात तालुक्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पाणीटंचाई निवारणार्थ तालुका प्रशासनाने पाणीटंचाई कृती आराखडा जाहिर केलेला. त्याअनुषंगाने पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये विविध उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. काही गावातील विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता कोणत्याच ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडWaterपाणी