शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

कुत्र्यांच्या हल्ल्यात रोहिचा मृत्यू; वनविभागच्या दिरंगाईमुळे प्राण गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 16:25 IST

वाशिम :  मालेगाव तालुक्यातील ग्राम शिरसाळा येथे पाण्याच्या शोधात आलेल्या वन्यप्राण्यावर (रोही) कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्यात तो प्राणी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना ७ जून रोजी घडली.

- नंदकिशोर नारे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मालेगाव तालुक्यातील ग्राम शिरसाळा येथे पाण्याच्या शोधात आलेल्या वन्यप्राण्यावर (रोही) कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्यात तो प्राणी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना ७ जून रोजी घडली. गावकºयांना ही बाब कळताच त्यांनी मालेगाव वनविभागाला भ्रमणध्वनी करुनही ते वेळेवर न पोहचल्याने त्याचा जीव गेला असल्याचा आरोप शिरसाळावासियांनी केला आहे.शिरसाळा या गावात पाण्याच्या शोधात आलेल्या रोहीवर गावातीलच काही कुत्र्यांनी हल्ला करुन जखमी केल्याचे ग्रामस्थांना कळाल्याने त्याचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही ग्रामस्थांनी मालेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, अधिकारी यांच्याशी संपर्कही साधला. तब्बल ५ तास उलटल्यानंतरही याची कोणीच दखल घेतली नाही. नागरिकांनी त्याला उचलून त्यांच्यापरिने उपचार करण्याचा प्रयत्न केला. पाच तासपर्यंत जीवंत असलेल्या रोहीवर वेळीच उपचार झाले असते तर त्याचा जीव नक्कीच वाचला असता असे ग्रामस्थांमध्ये बोलल्या जात आहे. यानंतर काही ग्रामस्थांनी वाशिमवनविभागाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क केला असता ती टिम ताबडतोब पोहचली परंतु कुत्र्यांनी रोहीला चांगलेच जखमी केल्याने त्याचे प्राण गेले होते. वनविभाागाच्या काही अधिकाºयांचे दुर्लक्ष, निष्काळजीपणामुळे एका वन्यप्राण्याला मात्र जीवाला मुकावे लागल्याची घटना ७ जून रोजी घडली.  यासंदर्भात मालेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता  घटनास्थळी आमचा स्टाफ होता. रोहीचा पाय तुटला होता.  रोहीचे शवविच्छेदन सद्यस्थितीत शिरपूर येथे सुरु असल्याचे सांगितले. मालेगाव वनपरिक्षेत्रातील अधिकारी कर्मचारी तेथे पोहचले होते का याबाबत विचारले असता त्यांनी वनविभागाचा स्टाफ होता मालेगावचा असो की वाशिमचा याने काय फरक पडतो असे सांगितले. यावरुन शिरसाळावासियांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे दिसून येते. याप्रकरणाची वरिष्ठांनी चौकशी करुन दोषी अधिकारी, कर्मचाºयांना जाब विचारणे गरजेचे झाले आहे.  रोही जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मालेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांन२२ी जायला पाहिजे होते परंतु त्यांची रात्रीची पेट्रोलिंग असल्याने वाशिमची टिम गेली होती. सकाळी ७ वाजता कळल्याबरोबर शिरपुटी येथील वनरक्षकास कळविले व तो ८ वाजता  घटनास्थळी पोहचला होता.  रोही रात्रीच्यावेळी खड्डयात पडला असावा त्यानंतर कुत्र्यांनी त्यावर हल्ला चढविला असावा, ही बाब सकाळी उघडकीस आली. वन्यप्राण्यावर हल्ला झाल्याने तो प्राणी शॉकमध्ये असल्याने मृत्यू झाला असावा. शेवटी मालेगावचे असो की वाशिमचे वनविभागाचे कर्मचारी घटनास्थही मात्र पोहचले होते.- सुमीत सोळंकेजिल्हा वनअधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव