शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

नवे रोहित्र १० दिवसानंतरही मिळेना; शेतकरी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 12:01 IST

MSEDCL NEWS अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र नादुरुस्त, बंद असल्याने सिंचन करण्यात अडथळे येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

ठळक मुद्देसद्य:स्थितीत जिल्ह्यात १६९ रोहित्र नादुरुस्त आहेत.तक्रार केल्यानंतर आठ दिवस रोहित्र मिळणे अपेक्षित आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम : यंदा प्रकल्प, धरणांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा आहे; परंतु विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने आणि बदलून मिळण्यास १०-१० दिवसांचा कालावधी लागत असल्याने सिंचनात व्यत्यय निर्माण होत आहे.यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. मूग, उडीद व सोयाबीन सोंगणी व काढणीच्या वेळी पाऊस आल्याने उत्पादनात प्रचंड घट आली होती. शेतकऱ्यांची सर्व भिस्त आता रब्बी हंगामातील पिकांवर आहे. पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने प्रकल्प, धरणांमध्ये मुबलक प्रमाणात जलसाठा आहे. दुसरीकडे अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र नादुरुस्त, बंद असल्याने सिंचन करण्यात अडथळे येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १६९ रोहित्र नादुरुस्त आहेत. यामध्ये ३३ केव्हीएचे २५, १०० केव्हीएचे ४१ आणि १६ केव्हीएच्या १०३ रोहित्रांचा समावेश आहे. रोहित्र बदलून मिळावे याकरिता शेतकरी हे लाइनमन व कनिष्ठ अभियंत्यांच्या माध्यमातून ‘फेलिअर रिपोर्ट’ महावितरणच्या संबंधित कार्यालयात सादर करतात. अनेक ठिकाणी १०-१० दिवस रोहित्र बदलून मिळत नसल्याने सिंचनात व्यत्यय निर्माण होत आहे. यंदा जिल्ह्यात ७२ हजार हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी हरभरा पिकाची ४८ हजार ७९१ हेक्टरवर झाली आहे.तक्रार करूनही प्रतीक्षेतच रोहित्र नादुरुस्त, बंद पडल्यानंतर लाइनमन किंवा कनिष्ठ अभियंत्यांकडे शेतकऱ्यांच्या वतीने तक्रार केली जाते. फेलिअर रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतरही १०, १० दिवस प्रतीक्षा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तक्रार केल्यानंतर आठ दिवस रोहित्र मिळणे अपेक्षित आहे.

शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे पिकांचे नुकसानसिंचन करण्यासाठी रोहित्राशिवाय अन्य पर्यायी व्यवस्था नाही. रोहित्र जळाल्यानंतर १५-१५ दिवस सिंचन करता येत नाही. त्यामुळे पिके कोमेजून उत्पादनात घट येण्याची भीती शेतकरी वर्तवित आहेत.

विद्युत रोहित्र बंद किंवा नादुरूस्त असल्याची तक्रार आणि फेलिअर रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर विद्युत रोहित्र बदलून दिले जात आहे. सद्यस्थितीत १६९ रोहित्र नादुरूस्त असून, ते बदलून देण्याची कार्यवाही सुरू आहे.- आर.जे. तायडे, कार्यकारी अभियंता, महावितरण

यंदा खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. मूग, उडीद व सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. आता सर्व भिस्त रब्बी हंगामावर आहे. रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर १०-१० दिवस बदलून दिले जात नाही.- गाैतम भगत, शेतकरी

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी