शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नवे रोहित्र १० दिवसानंतरही मिळेना; शेतकरी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 12:01 IST

MSEDCL NEWS अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र नादुरुस्त, बंद असल्याने सिंचन करण्यात अडथळे येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

ठळक मुद्देसद्य:स्थितीत जिल्ह्यात १६९ रोहित्र नादुरुस्त आहेत.तक्रार केल्यानंतर आठ दिवस रोहित्र मिळणे अपेक्षित आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम : यंदा प्रकल्प, धरणांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा आहे; परंतु विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने आणि बदलून मिळण्यास १०-१० दिवसांचा कालावधी लागत असल्याने सिंचनात व्यत्यय निर्माण होत आहे.यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. मूग, उडीद व सोयाबीन सोंगणी व काढणीच्या वेळी पाऊस आल्याने उत्पादनात प्रचंड घट आली होती. शेतकऱ्यांची सर्व भिस्त आता रब्बी हंगामातील पिकांवर आहे. पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने प्रकल्प, धरणांमध्ये मुबलक प्रमाणात जलसाठा आहे. दुसरीकडे अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र नादुरुस्त, बंद असल्याने सिंचन करण्यात अडथळे येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १६९ रोहित्र नादुरुस्त आहेत. यामध्ये ३३ केव्हीएचे २५, १०० केव्हीएचे ४१ आणि १६ केव्हीएच्या १०३ रोहित्रांचा समावेश आहे. रोहित्र बदलून मिळावे याकरिता शेतकरी हे लाइनमन व कनिष्ठ अभियंत्यांच्या माध्यमातून ‘फेलिअर रिपोर्ट’ महावितरणच्या संबंधित कार्यालयात सादर करतात. अनेक ठिकाणी १०-१० दिवस रोहित्र बदलून मिळत नसल्याने सिंचनात व्यत्यय निर्माण होत आहे. यंदा जिल्ह्यात ७२ हजार हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी हरभरा पिकाची ४८ हजार ७९१ हेक्टरवर झाली आहे.तक्रार करूनही प्रतीक्षेतच रोहित्र नादुरुस्त, बंद पडल्यानंतर लाइनमन किंवा कनिष्ठ अभियंत्यांकडे शेतकऱ्यांच्या वतीने तक्रार केली जाते. फेलिअर रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतरही १०, १० दिवस प्रतीक्षा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तक्रार केल्यानंतर आठ दिवस रोहित्र मिळणे अपेक्षित आहे.

शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे पिकांचे नुकसानसिंचन करण्यासाठी रोहित्राशिवाय अन्य पर्यायी व्यवस्था नाही. रोहित्र जळाल्यानंतर १५-१५ दिवस सिंचन करता येत नाही. त्यामुळे पिके कोमेजून उत्पादनात घट येण्याची भीती शेतकरी वर्तवित आहेत.

विद्युत रोहित्र बंद किंवा नादुरूस्त असल्याची तक्रार आणि फेलिअर रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर विद्युत रोहित्र बदलून दिले जात आहे. सद्यस्थितीत १६९ रोहित्र नादुरूस्त असून, ते बदलून देण्याची कार्यवाही सुरू आहे.- आर.जे. तायडे, कार्यकारी अभियंता, महावितरण

यंदा खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. मूग, उडीद व सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. आता सर्व भिस्त रब्बी हंगामावर आहे. रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर १०-१० दिवस बदलून दिले जात नाही.- गाैतम भगत, शेतकरी

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी