शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

नवे रोहित्र १० दिवसानंतरही मिळेना; शेतकरी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 12:01 IST

MSEDCL NEWS अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र नादुरुस्त, बंद असल्याने सिंचन करण्यात अडथळे येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

ठळक मुद्देसद्य:स्थितीत जिल्ह्यात १६९ रोहित्र नादुरुस्त आहेत.तक्रार केल्यानंतर आठ दिवस रोहित्र मिळणे अपेक्षित आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम : यंदा प्रकल्प, धरणांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा आहे; परंतु विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने आणि बदलून मिळण्यास १०-१० दिवसांचा कालावधी लागत असल्याने सिंचनात व्यत्यय निर्माण होत आहे.यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. मूग, उडीद व सोयाबीन सोंगणी व काढणीच्या वेळी पाऊस आल्याने उत्पादनात प्रचंड घट आली होती. शेतकऱ्यांची सर्व भिस्त आता रब्बी हंगामातील पिकांवर आहे. पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने प्रकल्प, धरणांमध्ये मुबलक प्रमाणात जलसाठा आहे. दुसरीकडे अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र नादुरुस्त, बंद असल्याने सिंचन करण्यात अडथळे येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १६९ रोहित्र नादुरुस्त आहेत. यामध्ये ३३ केव्हीएचे २५, १०० केव्हीएचे ४१ आणि १६ केव्हीएच्या १०३ रोहित्रांचा समावेश आहे. रोहित्र बदलून मिळावे याकरिता शेतकरी हे लाइनमन व कनिष्ठ अभियंत्यांच्या माध्यमातून ‘फेलिअर रिपोर्ट’ महावितरणच्या संबंधित कार्यालयात सादर करतात. अनेक ठिकाणी १०-१० दिवस रोहित्र बदलून मिळत नसल्याने सिंचनात व्यत्यय निर्माण होत आहे. यंदा जिल्ह्यात ७२ हजार हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी हरभरा पिकाची ४८ हजार ७९१ हेक्टरवर झाली आहे.तक्रार करूनही प्रतीक्षेतच रोहित्र नादुरुस्त, बंद पडल्यानंतर लाइनमन किंवा कनिष्ठ अभियंत्यांकडे शेतकऱ्यांच्या वतीने तक्रार केली जाते. फेलिअर रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतरही १०, १० दिवस प्रतीक्षा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तक्रार केल्यानंतर आठ दिवस रोहित्र मिळणे अपेक्षित आहे.

शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे पिकांचे नुकसानसिंचन करण्यासाठी रोहित्राशिवाय अन्य पर्यायी व्यवस्था नाही. रोहित्र जळाल्यानंतर १५-१५ दिवस सिंचन करता येत नाही. त्यामुळे पिके कोमेजून उत्पादनात घट येण्याची भीती शेतकरी वर्तवित आहेत.

विद्युत रोहित्र बंद किंवा नादुरूस्त असल्याची तक्रार आणि फेलिअर रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर विद्युत रोहित्र बदलून दिले जात आहे. सद्यस्थितीत १६९ रोहित्र नादुरूस्त असून, ते बदलून देण्याची कार्यवाही सुरू आहे.- आर.जे. तायडे, कार्यकारी अभियंता, महावितरण

यंदा खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. मूग, उडीद व सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. आता सर्व भिस्त रब्बी हंगामावर आहे. रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर १०-१० दिवस बदलून दिले जात नाही.- गाैतम भगत, शेतकरी

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी