शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

‘एनसीसी’च्या प्रवेशाला यंदा मुहूर्त मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:44 IST

वाशिम : शाळा स्तरावर इयत्ता आठवीतील इच्छुक विद्यार्थ्यांना दरवर्षी राष्ट्रीय छात्र सेना अर्थात ‘एनसीसी’मध्ये प्रवेश दिला जातो. ही प्रक्रिया ...

वाशिम : शाळा स्तरावर इयत्ता आठवीतील इच्छुक विद्यार्थ्यांना दरवर्षी राष्ट्रीय छात्र सेना अर्थात ‘एनसीसी’मध्ये प्रवेश दिला जातो. ही प्रक्रिया जुलै महिन्यात राबविण्यात येते. यंदा मात्र ऑगस्ट महिना संपत आला असतानाही वरिष्ठ स्तरावरून कुठलीच हालचाल नसून विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्या १७ महिन्यांपासून सर्वच ठिकाणच्या शाळा बंद आहेत. या धामधुमीत गतवर्षी जुलै महिन्यात अमरावती येथील ‘ग्रुप हेड क्वाॅर्टर’कडून जिल्ह्यातील शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ‘एनराॅलमेंट नंबर’ देण्यात आला. त्याआधारे वाशिम शहरातील बाकलीवाल विद्यालयातील ३८, न.प. महात्मा गांधी विद्यालय २५ आणि मंगरूळपीर येथील जि.प. शाळेतील ३८ अशा एकूण १०१ विद्यार्थ्यांना ‘एनसीसी’मध्ये प्रवेश मिळाला; मात्र चालूवर्षी ऑगस्ट महिना संपत आला असतानाही ‘एनराॅलमेंट नंबर’ अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. यामुळे प्रवेश प्रक्रियेस अद्यापपर्यंत सुरुवात होऊ शकली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

.......................

बाॅक्स :

आर्मीची चमू यंदा आलीच नाही

इयत्ता आठवीतील इच्छुक विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये प्रवेश देण्यापूर्वी त्यांची चाचणी घेण्याकरिता दरवर्षी ३ ते ५ जणांचा समावेश असलेली आर्मीची चमू शाळांमध्ये येत असते. चालूवर्षी मात्र अद्यापपर्यंत प्रवेश प्रक्रियाच सुरू झाली नसल्याने ही चमू आलेली नाही.

..................

शालेय जिवनात ‘एनसीसी’चे फायदे

एनसीसीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना ‘ए’ आणि ‘सी’ प्रमाणपत्र मिळते. लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये अधिकारी किंवा जवान म्हणून काम करण्याची संधी मिळते.

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी अतिरिक्त तीन गुण मिळतात.

पॉलिटेक्निक महाविद्यालयात १५ जागा राखीव असतात.

राज्यस्तरावर नेतृत्व करणाऱ्या एनसीसी कॅडेटला अभियांत्रिकी महाविद्यालयात १० जागा राखीव असतात.

आयटीआयच्या प्रवेशासाठी अतिरिक्त गुण, पॅरामिलिट्री फोर्समध्ये १० गुण, टेलिकम्युनिकेशन भरतीमध्ये अतिरिक्त १० गुण, पोलीस भरतीमध्ये अतिरिक्त गुण, बीएसएफ, सीआरपीएफ आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ भरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळतात. ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केल्यास खासगी क्षेत्रात संरक्षण अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळते.

...............

कोट :

‘एनसीसी’च्या माध्यमातून विद्यार्थी दशेतच मुलांना शिस्त, संयम, परिश्रम आणि देशसेवेचे बाळकडू पाजले जाते. शिवाय विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच देशासाठी, मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आणि जिद्द एनसीसीमुळे मिळते. यावर्षीही अनेक विद्यार्थी एनसीसीसाठी इच्छुक आहेत; मात्र प्रवेश प्रक्रियेसंबंधी कुठलाच निर्णय अद्याप झालेला नाही.

- अमोल काळे, एनसीसी अधिकारी, श्री बाकलीवाल विद्यालय, वाशिम