शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

‘एनसीसी’च्या प्रवेशाला यंदा मुहूर्त मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:44 IST

वाशिम : शाळा स्तरावर इयत्ता आठवीतील इच्छुक विद्यार्थ्यांना दरवर्षी राष्ट्रीय छात्र सेना अर्थात ‘एनसीसी’मध्ये प्रवेश दिला जातो. ही प्रक्रिया ...

वाशिम : शाळा स्तरावर इयत्ता आठवीतील इच्छुक विद्यार्थ्यांना दरवर्षी राष्ट्रीय छात्र सेना अर्थात ‘एनसीसी’मध्ये प्रवेश दिला जातो. ही प्रक्रिया जुलै महिन्यात राबविण्यात येते. यंदा मात्र ऑगस्ट महिना संपत आला असतानाही वरिष्ठ स्तरावरून कुठलीच हालचाल नसून विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्या १७ महिन्यांपासून सर्वच ठिकाणच्या शाळा बंद आहेत. या धामधुमीत गतवर्षी जुलै महिन्यात अमरावती येथील ‘ग्रुप हेड क्वाॅर्टर’कडून जिल्ह्यातील शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ‘एनराॅलमेंट नंबर’ देण्यात आला. त्याआधारे वाशिम शहरातील बाकलीवाल विद्यालयातील ३८, न.प. महात्मा गांधी विद्यालय २५ आणि मंगरूळपीर येथील जि.प. शाळेतील ३८ अशा एकूण १०१ विद्यार्थ्यांना ‘एनसीसी’मध्ये प्रवेश मिळाला; मात्र चालूवर्षी ऑगस्ट महिना संपत आला असतानाही ‘एनराॅलमेंट नंबर’ अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. यामुळे प्रवेश प्रक्रियेस अद्यापपर्यंत सुरुवात होऊ शकली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

.......................

बाॅक्स :

आर्मीची चमू यंदा आलीच नाही

इयत्ता आठवीतील इच्छुक विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये प्रवेश देण्यापूर्वी त्यांची चाचणी घेण्याकरिता दरवर्षी ३ ते ५ जणांचा समावेश असलेली आर्मीची चमू शाळांमध्ये येत असते. चालूवर्षी मात्र अद्यापपर्यंत प्रवेश प्रक्रियाच सुरू झाली नसल्याने ही चमू आलेली नाही.

..................

शालेय जिवनात ‘एनसीसी’चे फायदे

एनसीसीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना ‘ए’ आणि ‘सी’ प्रमाणपत्र मिळते. लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये अधिकारी किंवा जवान म्हणून काम करण्याची संधी मिळते.

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी अतिरिक्त तीन गुण मिळतात.

पॉलिटेक्निक महाविद्यालयात १५ जागा राखीव असतात.

राज्यस्तरावर नेतृत्व करणाऱ्या एनसीसी कॅडेटला अभियांत्रिकी महाविद्यालयात १० जागा राखीव असतात.

आयटीआयच्या प्रवेशासाठी अतिरिक्त गुण, पॅरामिलिट्री फोर्समध्ये १० गुण, टेलिकम्युनिकेशन भरतीमध्ये अतिरिक्त १० गुण, पोलीस भरतीमध्ये अतिरिक्त गुण, बीएसएफ, सीआरपीएफ आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ भरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळतात. ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केल्यास खासगी क्षेत्रात संरक्षण अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळते.

...............

कोट :

‘एनसीसी’च्या माध्यमातून विद्यार्थी दशेतच मुलांना शिस्त, संयम, परिश्रम आणि देशसेवेचे बाळकडू पाजले जाते. शिवाय विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच देशासाठी, मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आणि जिद्द एनसीसीमुळे मिळते. यावर्षीही अनेक विद्यार्थी एनसीसीसाठी इच्छुक आहेत; मात्र प्रवेश प्रक्रियेसंबंधी कुठलाच निर्णय अद्याप झालेला नाही.

- अमोल काळे, एनसीसी अधिकारी, श्री बाकलीवाल विद्यालय, वाशिम