शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवूणक केली - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:05 IST

वाशिम : ‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करीत जनतेची फसवणूक करणाऱ्या या मोदी सरकारला हटविण्याचे आवाहन विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी येथे केले.

- नंदकिशोर नारेवाशिम : ‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करीत जनतेची फसवणूक करणाऱ्या या मोदी सरकारला हटविण्याचे आवाहन विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी येथे केले.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेस-राकाँं आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ८ एप्रिल रोजी वाशिम येथे आले असता ते बोलत होते.पुढे बोलतंना धनंजय मुंडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, देश बदल रहा है, पंरतु पाच वर्षाच्या काळात एकही बदल झालेला दिसत नाही. उलट खोटी आश्वासने व फसव्या घोषणा करुन महागाईने जनता त्रस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व बरोजगारी वाढली आहे, असे सांगून जनतेला प्रश्न केला की, मोदी सरकारने पाच वर्षाच्या कार्यकाळात एक तरी व्यक्ती सांगा कोणाला फायदा झाला. त्यावेळी जनतेतून जोराने ‘नाही’ अशा घोषणा देण्यात आल्यात. काँग्रेसचे सरकार ज्यावेळी होते त्यावेळी महागाई आटोक्यात होती. सरासरी ५० रुपये पेट्रोलचे दर होते. आज हे भाव सरासरी ८० रुपयावर गेले आहेत. एका व्यक्तिला दररोज समजा एक लिटर पेट्रोल लागत असेल तर ५ वर्षात मोदी सरकारने तुमच्या खिशातील किती रुपये नेलेत. हे घरी गेल्यानंतर हिसोब करुन मला सांगा. गॅस सिलिंडरची त्यावेळीची किंमत व आजची किंमतमधील तफावत पहा महागाई कोणी वाढविली हे कोणाला सांगण्याची गरज पडणार नाही. एका व्यक्तिमागे २ लाख रुपयाची लूट मोदींनी केली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. काँग्रेस - राष्टÑवादी काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्यावेळी कोणाला रांगेत उभे केले नाही.  यावेळी त्यांनी नोटबंदी, स्कील इंडिया, मेकिंग इंडिया आदींवर घणाघाती टीका केली.

टॅग्स :washimवाशिमyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमDhananjay Mundeधनंजय मुंडेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक