शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नागरी पायाभूत सुविधेला मंगरुळपीर पालिका प्रशासनाकडून कोलदांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 14:05 IST

मंगरुळपीर : येथील नगरपरिषदचा कारभार कमालीचा ढेपाळला आहे. पायाभूत सुविधा पुरविण्यास प्रशासन सपसेल अपयशी ठरले आहे. परिणामी शहरवासीयांच्या असंतोषाचे रूपांतर उग्र रूपात रस्त्यावर उतरून करीत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरीकांना यातना भोगाव्या लागत आहे.मुख्याधिकारी स्वताच अपडाऊन करीत असल्याने त्यांच्या गैरहजेरीत काही कर्मचारी सुध्दा दांड्या मारीत गैरहजर असतात. स्वच्छता अभियानाला कुलूपबंद करण्यात आल्याने शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.

मंगरुळपीर : येथील नगरपरिषदचा कारभार कमालीचा ढेपाळला आहे. पायाभूत सुविधा पुरविण्यास प्रशासन सपसेल अपयशी ठरले आहे. परिणामी शहरवासीयांच्या असंतोषाचे रूपांतर उग्र रूपात रस्त्यावर उतरून करीत आहे. शासनाने अशा संवेदनशील प्रसंगी लक्ष न घातल्यास मोठी दुर्घटना होण्याची संभावना व्यक्त केल्या जात आहे. 

       सन १९७२ पेक्षाही अधिक प्रमाणात मंगरूळपीर शहरात दुष्काळ निर्माण झाला आहे. तेव्हा किमान पिण्यास पाणी उपलब्ध होत होते. सध्या मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरीकांना यातना भोगाव्या लागत आहे. यंदा शहरातली प्रशासनाच्या सुरवाती पासून नियोजन नव्हते. सन २०१६ ला मोतसावंगा धरणातून शहरात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. त्या बाबत ग्राम मानोली सरपंचानी नगर परिषदला निवेदन देवून, दररोज लाखो लिटर पाणी वाया चालले गेले आहे. हि बाब नगरसेवक अनिल गावंडे यांनी लेखीरूपात  ९ जाने. २०१७ ला प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. पण पालिका प्रशासन ढिम्म होते. अजुनही पाईपलाईन दुरूस्ती झाली नसल्याचे समजते. शिवाजी चौकातील डॉ. खोडके यांच्या दवाखाना समोर तब्बल चार महिने पाईपलाईन फुटलेली होती. त्यातून लाखो लिटर्स पाणी वाया जात होते. सभोतालच्या नागरीकांनी तक्रारी करून मार्च महिण्याच्या अखेर आंदोलनाचा इशारा दिल्यावर पाईपलाईन दुरूस्ती करण्यात आली.

दरम्यान पालिकेला प्रथमच महिला मुख्याधिकारी लाभल्या, परंतू त्यांचे नागरिकासहच पदाधिकाºयांसोबत असहकार धोरण दिसून येत आहे.   मुख्याधिकारी स्वताच अपडाऊन करीत असल्याने त्यांच्या गैरहजेरीत काही कर्मचारी सुध्दा दांड्या मारीत गैरहजर असतात. स्वच्छता अभियानाला कुलूपबंद करण्यात आल्याने शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. घंटागाड्या बंद पडल्या आहे. दोन महिण्यापासून पथदिवे बंद पडलेले आहे. अतिक्रमणचा मुद्दा तर मुख्याधिकारीनी चांगलाच टोलावलेला आहे. मुदतबाह्य शॉपिंग सेंटर व भूखंड लिज प्रकरण पध्दतशीरपणे भिजत ठेवण्यात आलेले आहे. अनेकांना मालमत्ता नोंदीसाठी त्रस्त केल्या जात आहे. ज्या नागरी पायाभूत सुविधा पालिका प्रशासनाने दयावयास पाहिजे तेवढ्या नियमशीर शहरवासीयांना पुरवाव्या. एवढी रास्त अपेक्षा शहरवासी बोलून दाखवित आहे. अन्यथा ज्यावेळी संतापाचा बांध फुटेल तेव्हा मोठी दुर्घटना घडल्यास संबंधीत प्रशासनच जवाबदार ठरेल, असे नागरिकांत बोलल्या जात आहे. 

कोणत्याचा मुलभूत सुविधा न पुरविण्यात येत असल्याने नगर परिषद बरखास्त करून प्रशासक नेमा. 

-अनिल गावंडे, भाजप नगरसेवक

 

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर