शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

बहुतांश ई-क्लास जमिनीवर वृक्ष लागवडच नाही ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 17:28 IST

काही ग्रामपंचायती अंतर्र्गत ई-क्लास जमिनीवर वृक्ष लागवड पूर्ण झालेली नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्क              वाशिम: शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात ४० लाख वृक्ष लावण्यात येत आहेत. ही मोहीम वेगात सुरू आहे; परंतु वृक्ष लागवडीसाठी सर्वात पुरक आणि फायदेशीर असलेल्या  ई-क्लास जमिनीवर अद्याप वृक्ष लागवड पूर्ण झाली नसल्याचे दिसत आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी याची दखल घेऊन वृक्ष लागवडीला वेग देणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण प्रेमींच्यावतीने व्यक्त होत आहे. राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत वाशिम जिल्ह्यासाठी ४० लाख ३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी वृक्षरोपे उपलब्ध करण्याची जबाबदारी सामाजिक वनीकरण आणि वनविभागाकडे असून, या दोन्ही विभागांनी निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षरोपे उपलब्धही केली आहेत. जिल्ह्यात निर्धारित उद्दिष्टापैकी अधिकाधिक वृक्ष लागवड ही ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया ई-क्लास जमिनीवर होणार आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभागांतर्गत १० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले असून, ग्रामपंचायत निहाय उद्दिष्टही निश्चित करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी काही ग्रामपंचायतींनी ई-क्लासवर अधिकाधिक वृक्ष लागवडीसाठी लोकसहभाग वाढावा म्हणून विविध उपक्रमही राबविले आणि त्याचा मोठा फायदा झाला. अनेक ग्रामपंचायतींनी निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड जुलै महिन्यातच केली. तथापि, अद्यापही काही ग्रामपंचायती अंतर्गत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निम्मेही झाले नाही. मधल्या काळात पावसाने दडी मारल्याने वृक्ष लागवड मोहिमेत खोळंबा निर्माण झाला होता; परंतु आता जिल्ह्यात १० ते १२ दिवस सतत पाऊस पडला आणि तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीपही दिली आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीला वेग मिळणे अपेक्षीत होते; परंतु अद्यापही काही ग्रामपंचायती अंतर्र्गत ई-क्लास जमिनीवर वृक्ष लागवड पूर्ण झालेली नाही. 

वृक्ष लागवडीचा सतत आढावा जिल्हाधिकारी घेत आहेत. पूर्वी पावसाअभावी आणि नंतर सततच्या पावसामुळे वृक्ष लागवड थांबली होती. आता वृक्ष लागवडीला वेग देण्यात आला असून, आमचे ६० टक्के उद्दिष्टही पूर्ण झाले आहे. नियोजित ई-क्लास जमिनीवर निर्धारित मुदतीपूर्वीच वृक्ष लागवड करण्यात येणार असून, यासाठी ग्रामपंचायतींना सुचनाही देण्यात आल्या आहेत. -उत्तमराव फडसहाय्यक वनसंरक्षकसामाजिक वनीक रण, वाशिम

टॅग्स :washimवाशिमforestजंगल