शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सर आली धावून... राज्यातील २४९ तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पाऊस

By दादाराव गायकवाड | Updated: September 2, 2022 17:00 IST

जुलै, ऑगस्टमधील दमदार पावसाचा परिणाम

वाशिम: राज्यात यंदा मान्सून विलंबाने दाखल झाला असला तरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पावसाच्या सरासरीत कमालीची वाढ झाली असून, हवामान विभागाच्या अहवालानुसार १ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५५ पैकी तब्बल २४९ तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

मान्सून विलंबाने दाखल झाल्यानंतर जुलैपासून राज्याच्या विविध भागात पावसाने धुमाकूळ घातला, ऑगस्टमध्ये पावसाचा धडाका अधिकच वाढला. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाची सरासरी खूप अधिक राहिली. ऑगस्टमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले, शिवाय जनजीवनही विस्कळीत झाले होते. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २४९ तालुक्यांत १ जूनपासून १ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या अहवालात नमूद आहे. शिवाय तर ९५ तालुक्यात ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत पाऊस पडला आहे. शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस असलेल्या २४९ तालुक्यांत नांदेड (१६), यवतमाळ (१५), नागपूर (१४), नाशिक, अहमदनगर आणि चंद्रपूर (प्रत्येकी १३), पुणे (१२), गडचिरोली (११) आणि सांगली (१०) या नऊ जिल्ह्यातीलच ९१ तालुक्यांचा समावेश आहे.

११ तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

एकीकडे ३५५ तालुक्यांपैकी २४९ तालुक्यात पावसाचे प्रमाण शंभर टक्क्यांपेक्षा अधिक असताना ११ तालुक्यात पावसाचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील अकोट, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, नाशिकमधील इगतपुरी, जळगावमधील बोधवाडा, सोलापुरातील सांगाेळा, साताऱ्यातील महाबळेश्वर, कोल्हापुरातील चांदगड, राधानगरी आणि बावडा, तसेच परभणी जिल्ह्यातील परभणी आणि पथारी या दोन तालुक्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Rainपाऊसwashimवाशिम