शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सर आली धावून... राज्यातील २४९ तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पाऊस

By दादाराव गायकवाड | Updated: September 2, 2022 17:00 IST

जुलै, ऑगस्टमधील दमदार पावसाचा परिणाम

वाशिम: राज्यात यंदा मान्सून विलंबाने दाखल झाला असला तरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पावसाच्या सरासरीत कमालीची वाढ झाली असून, हवामान विभागाच्या अहवालानुसार १ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५५ पैकी तब्बल २४९ तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

मान्सून विलंबाने दाखल झाल्यानंतर जुलैपासून राज्याच्या विविध भागात पावसाने धुमाकूळ घातला, ऑगस्टमध्ये पावसाचा धडाका अधिकच वाढला. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाची सरासरी खूप अधिक राहिली. ऑगस्टमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले, शिवाय जनजीवनही विस्कळीत झाले होते. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २४९ तालुक्यांत १ जूनपासून १ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या अहवालात नमूद आहे. शिवाय तर ९५ तालुक्यात ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत पाऊस पडला आहे. शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस असलेल्या २४९ तालुक्यांत नांदेड (१६), यवतमाळ (१५), नागपूर (१४), नाशिक, अहमदनगर आणि चंद्रपूर (प्रत्येकी १३), पुणे (१२), गडचिरोली (११) आणि सांगली (१०) या नऊ जिल्ह्यातीलच ९१ तालुक्यांचा समावेश आहे.

११ तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

एकीकडे ३५५ तालुक्यांपैकी २४९ तालुक्यात पावसाचे प्रमाण शंभर टक्क्यांपेक्षा अधिक असताना ११ तालुक्यात पावसाचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील अकोट, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, नाशिकमधील इगतपुरी, जळगावमधील बोधवाडा, सोलापुरातील सांगाेळा, साताऱ्यातील महाबळेश्वर, कोल्हापुरातील चांदगड, राधानगरी आणि बावडा, तसेच परभणी जिल्ह्यातील परभणी आणि पथारी या दोन तालुक्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Rainपाऊसwashimवाशिम