शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाशिम जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक बॅरेज कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:43 IST

वाशिम: शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्ह्यात मोठ्या नद्यांच्या पात्रात बॅरेजेसची उभारणी करण्यात आली; परंतु या बॅरेजस लगत नदीपात्रात गाळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाणी वाहून जात असल्याने निम्म्याहून अधिक बॅरेज हिवाळ्यांतच कोरडे पडले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्ह्यात मोठ्या नद्यांच्या पात्रात बॅरेजेसची उभारणी करण्यात आली; परंतु या बॅरेजस लगत नदीपात्रात गाळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाणी वाहून जात असल्याने निम्म्याहून अधिक बॅरेज हिवाळ्यांतच कोरडे पडले आहेत. पाटबंधारे विभागाच्यावतीने जिल्ह्यातील पैनगंगा, पूस, अडाण, बेंबळा या सारख्या मोठ्या नद्यांच्या पात्रात पाणी अडवून शेतकºयांचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून बॅरेजेस किंवा कोल्हापुरी बंधाºयांची उभारणी करण्यात आली. यात एकट्या वाशिम जिल्ह्यातच उकळी, अडगाव, गणेशपुर, कोकलगाव, ढिल्ली, जुमडा, राजगाव, टनका, जयपूर, सोनगव्हाण आदि ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आले आहेत. या बॅरेजेसमुळे संबंधित भागांतील शेतकºयांना मोठा फायदाही झाला आणि सिंचन क्षेत्रात वाढ झाली. या बॅरेजेसमुळे संबंधित गावांतील पाणी पातळीतही वाढ झाल्याने शेतकºयांना भाजीपाला पिके घेणेही शक्य होऊ लागले; परंतु या बॅरेजेसची देखभाल आणि साठवण क्षमता कायम ठेवण्याबाबत फारशी गंभीरता बाळगण्यात आली नाही. त्यामुळे या बॅरेजेस लगत मोठ्या प्रमाणात गाळ साचत आहे. त्यामुळे या बॅरेजेसलगत पाणी साचण्याचे प्रमाणही कमी झाले असून, आता जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक बॅरेज हिवाळ्यातच कोरडे पडल्याने संबंधित बॅरेजवर अवलंबून असलेल्या शेतकºयांची पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्याशिवा बॅरेजेसची पाणी साठवण क्षमता कमी झाल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीवर पुन्हा परिणाम होऊन ती खालावत आहे. त्यातच काही बॅरेजेस जीर्ण होत आहेत. संबंधित विभागाने या बॅरेजेसची पाहणी करावी आणि गाळाचा उपसा करून बॅरेजेसची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमDamधरण