शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पीक नुकसानभरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 7:23 PM

रिसोड तहसिल कार्यालयासमोर शेतकयांसह भव्य मोर्चा काढला

भरपाई न दिल्यास मंत्र्यांच्या घरासमोर दिवाळी साजरा करण्याचा इशारा : शेतकºयांची लक्षणीय उपस्थितीरिसोड : अतिपावसाने सोयाबीन, कापूस, मका व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे १३ आॅक्टोबर रोजी रिसोड तहसिल कार्यालयासमोर शेतकयांसह भव्य मोर्चा काढला. यावेळी अतिपावसाने खराब झालेले सोयाबीन तहसील कार्यालयासमोर शेतकºयांनी आणून टाकले. शनिवार, रविवारी झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कपाशीसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. अद्याप पंचनामे सुरू झाले नाहीत. त्यामुळे भरपाई मिळेल की नाही? याबाबत साशंकता आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात रिसोड तहसिल कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी २५  हजार नुकसानभरपाई मिळणार नाही; तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, संपूर्ण विदर्भ-मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी आंदोलन उभे करणार करणार असून, त्याची सुरूवात रिसोड येथून झाली. सरकारने शेतकºयांना लवकर नुकसानभरपाई दिली नाही तर येणारी दिवाळी ही शेतकºयांसह मंत्र्यांच्या घरी साजरी करू, असा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला. सकाळपासून शेतकºयांसह तहसील कार्यालयासमोर ठिय्या मारून बसल्यानंतर प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली. तहसीलदार आशिष शेलार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तात्काळ पंचनाम्याचे आदेश देवून लवकरच नुकसान भरपाईसाठी सकारात्मक अहवाल पाठविणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानीचे विदर्भप्रमुख दामूअण्णा इंगोले यांच्यासह शेतकरी, पदाधिकाºयांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRisodरिसोड