शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पावसाळ्यापूर्वी भोपळपेंड नदीच्या नाल्यांचे खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 15:00 IST

आसेगाव (वाशिम) : पावसाळा तोंडावर आला असताना भोपळपेंड नदीला जोडणाºया नाल्यांना पूर येऊन शेतकºयांचे नुकसान व दळणवळण ठप्प होऊ नये म्हणून महसूल विभागाच्यावतीने या नाल्यांतीन गाळ, कचरा काढून त्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम) : पावसाळा तोंडावर आला असताना भोपळपेंड नदीला जोडणाºया नाल्यांना पूर येऊन शेतकºयांचे नुकसान व दळणवळण ठप्प होऊ नये म्हणून महसूल विभागाच्यावतीने या नाल्यांतीन गाळ, कचरा काढून त्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात येत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी दलेलपूर आणि नांदगावदरम्यान वाहणाºया भोपळपेंड नदीला आसेगाव परिसरातील सार्सी, नांदगाव, आसेगाव आणि चिंचोली परिसरातील अनेक नाले जोडले आहेत. या नाल्यांची अनेक वर्षांपासून साफसफाई झालेली नाही. या नाल्यात गाळ, कचरा साचला आहेच शिवाय नाल्यांत झुडपेही वाढली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या नाल्यांना पूर येऊन मार्गावरील वाहतूक ठप्प होते. त्याचा फटका संबंधित गावांतील लोकांना सहन करावा लागतो. गंभीर आजारावर उपचारासाठी तातडीने शहराच्या ठिकाणी पोहोचता येत नाही. त्यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची भिती असते. शिवाय खरीप हंगामात शेतीसाठी विविध साहित्यांची नेआण करणाºया शेतकरी, शैक्षणिक प्रवास करणारे विद्यार्थी, महत्त्वाच्या कामांसाठी शहरात जाणाºया ग्रामस्थांनाही यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो, तसेच नाल्याकाठच्या शेतांत पाणी घुसल्याने शेतकºयांचे अतोनात नुकनसान होते. ही समस्या दूर करण्यासाठी महसूल विभागाने पावसाळ्यापूर्वी भोपळपेंड नदीला जोडणाºया आसेगाव-धानोरा मार्गावरील पुल, तसेच नांदगावनजिकच्या नाल्यांसह प्रत्येक नाल्यातील गाळ आणि कचरा काढण्यासह या नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे या नाल्यांना पूर न येता पावसाचे पाणी थेट नदीपात्रात पोहोचणार आहे. त्यामुळे परिसरातील जलपातळीही वाढणार असून, लोकांची वाहतुकीची समस्या दूर होणार आहे. तथापि, या नदीला जोडणाºया नाल्यावर मंगरुळपीर-अनसिंग मार्गावर शिवणी आणि नांददरम्यान असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने येथील समस्या दूर होणार नाही. त्यामुळे या पुलाची उंची वाढविणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.   शिवणीच्या ग्रामस्थांनी केले होते आंदोलनभोपळपेंड नदीवर नांदगावनजिक असलेला पूल, तसेच इतर नाल्यांचे अनेक वर्षांपासून खोलीकरण न केल्याने या नाल्यांना पूर येऊन दरवर्षी शेतात पाणी घुसते. त्यामुळे पिके वाहून जातात आणि शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. प्रशासनाने ही समस्या दूर करण्यासाठी नाल्यांचे खोलीकरण करावे, या मागणीसाठी महिनाभरापूर्वी शिवणी दलेलपूरसह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी मंगरुळपीर तहसील कार्यालयासमोर आंदोलनही केले होते.

टॅग्स :washimवाशिमriverनदी