शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पावसाळ्यापूर्वी भोपळपेंड नदीच्या नाल्यांचे खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 15:00 IST

आसेगाव (वाशिम) : पावसाळा तोंडावर आला असताना भोपळपेंड नदीला जोडणाºया नाल्यांना पूर येऊन शेतकºयांचे नुकसान व दळणवळण ठप्प होऊ नये म्हणून महसूल विभागाच्यावतीने या नाल्यांतीन गाळ, कचरा काढून त्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम) : पावसाळा तोंडावर आला असताना भोपळपेंड नदीला जोडणाºया नाल्यांना पूर येऊन शेतकºयांचे नुकसान व दळणवळण ठप्प होऊ नये म्हणून महसूल विभागाच्यावतीने या नाल्यांतीन गाळ, कचरा काढून त्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात येत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी दलेलपूर आणि नांदगावदरम्यान वाहणाºया भोपळपेंड नदीला आसेगाव परिसरातील सार्सी, नांदगाव, आसेगाव आणि चिंचोली परिसरातील अनेक नाले जोडले आहेत. या नाल्यांची अनेक वर्षांपासून साफसफाई झालेली नाही. या नाल्यात गाळ, कचरा साचला आहेच शिवाय नाल्यांत झुडपेही वाढली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या नाल्यांना पूर येऊन मार्गावरील वाहतूक ठप्प होते. त्याचा फटका संबंधित गावांतील लोकांना सहन करावा लागतो. गंभीर आजारावर उपचारासाठी तातडीने शहराच्या ठिकाणी पोहोचता येत नाही. त्यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची भिती असते. शिवाय खरीप हंगामात शेतीसाठी विविध साहित्यांची नेआण करणाºया शेतकरी, शैक्षणिक प्रवास करणारे विद्यार्थी, महत्त्वाच्या कामांसाठी शहरात जाणाºया ग्रामस्थांनाही यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो, तसेच नाल्याकाठच्या शेतांत पाणी घुसल्याने शेतकºयांचे अतोनात नुकनसान होते. ही समस्या दूर करण्यासाठी महसूल विभागाने पावसाळ्यापूर्वी भोपळपेंड नदीला जोडणाºया आसेगाव-धानोरा मार्गावरील पुल, तसेच नांदगावनजिकच्या नाल्यांसह प्रत्येक नाल्यातील गाळ आणि कचरा काढण्यासह या नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे या नाल्यांना पूर न येता पावसाचे पाणी थेट नदीपात्रात पोहोचणार आहे. त्यामुळे परिसरातील जलपातळीही वाढणार असून, लोकांची वाहतुकीची समस्या दूर होणार आहे. तथापि, या नदीला जोडणाºया नाल्यावर मंगरुळपीर-अनसिंग मार्गावर शिवणी आणि नांददरम्यान असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने येथील समस्या दूर होणार नाही. त्यामुळे या पुलाची उंची वाढविणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.   शिवणीच्या ग्रामस्थांनी केले होते आंदोलनभोपळपेंड नदीवर नांदगावनजिक असलेला पूल, तसेच इतर नाल्यांचे अनेक वर्षांपासून खोलीकरण न केल्याने या नाल्यांना पूर येऊन दरवर्षी शेतात पाणी घुसते. त्यामुळे पिके वाहून जातात आणि शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. प्रशासनाने ही समस्या दूर करण्यासाठी नाल्यांचे खोलीकरण करावे, या मागणीसाठी महिनाभरापूर्वी शिवणी दलेलपूरसह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी मंगरुळपीर तहसील कार्यालयासमोर आंदोलनही केले होते.

टॅग्स :washimवाशिमriverनदी