शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पोषण आहारातील ज्वारी, नाचणीचे पदार्थ कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 13:38 IST

योग्य नियोजनाअभावी ही योजना राबविण्यासाठी २५ टक्के तांदळाची कपात करून बाजरी, ज्वारी आणि नाचणीची मागणीच नोंदविता आली नाही.

वाशिम: राज्य शासनाने गत चार महिन्यांपूर्वी शालेय पोषण आहारात बदल करून ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ देण्याची योजना आखली होती. या योजनेची अंमलबजावणी आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून केली जाणार होती; परंतु योग्य नियोजनाअभावी ही योजना राबविण्यासाठी २५ टक्के तांदळाची कपात करून बाजरी, ज्वारी आणि नाचणीची मागणीच नोंदविता आली नाही. त्यामुळे ही योजना कागदावरच राहिली आहे.शालेय पोषण आहार ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीकरिता विद्यार्थी संख्या मंजूर केली जाते. मंजूर विद्यार्थी संख्येनुसार प्रतिविद्यार्थी प्रतिदिन १०० ग्रॅम व १५० ग्रॅमप्रमाणे तांदूळ अथवा इतर धान्य मंजूर केले जाते. जिल्ह्यात सुमारे ३,०५८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या आहारात विविधता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहारात ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या पदार्थांचा समावेश करण्याचा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच घेतला होता. या निर्णयानुसार पोषण आहारासाठी तांदळाच्या मागणीत २५ टक्क्यांची कपात करून त्याऐवजी ज्वारी, नाचणी, बाजरी या धान्याचा वापर करून विविध पदार्थ, पाककृती निश्चित करण्याच्या सूचनाही सर्वच जिल्हास्तरावर देण्यात आल्या होत्या. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आॅक्टोबर २०१९ ते मार्च २०२० या वर्षाकरिता ज्वारी, नाचणी व बाजरीची मागणी संचालनालयास विहित नमुन्यात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. तथापि, आॅक्टोबर महिना अर्धा उलटला तरी, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक धान्याची मागणीच नोंदविण्यात आली नाही. योग्य नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार, या कारणांमुळे ही योजना कागदावरच राहिल्याची चर्चा आता पालक वर्गात सुरू आहे. 

शालेय पोषण आहारातील बदलानुसार ज्वारी, बाजरी आणि नाचणीची मागणी नोंदविण्याच्या सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्या होत्या. त्याच वेळी या संदर्भात स्वतंत्र सूचनाही निर्गमित होणार असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु अद्याप अशा कोणत्याच सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ वितरित होत नसून, पूर्वीच्या पुरवठ्यातून शालेय पोषण आहार देण्यात येत आहे.- गजाननराव डाबेरावप्र. उपशिक्षणाधिकारी, जि. प. वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा