शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
4
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
5
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
6
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
7
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
8
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
9
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
10
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
11
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
12
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
13
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
14
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
15
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
16
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
17
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
18
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
20
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?

पारा घसरला; बोचऱ्या थंडीने वाशिमकर हैरान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:51 IST

जिल्हयातील वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण आणि थंडीची लाट पसरलेली दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वातावरणातील अचानक बदल होऊन तापमान १७ अंशावर गेले. गत दोन दिवसांपासून जिल्हयात थंडी वाढू लागल्याने दिवसा रस्त्यावर फिरणाºया नागरिकांच्या अंगात गरम कपडे दिसून येत आहेत. वातावरणात गारवा व ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.यावर्षी उन्हाळा तसेच पावसाळयातही ऋतुचक्रातील बदलाचा परिणाम दिसून आला. जवळपास जुलै अखेरपर्यंत तापमानाचा जोर व उन्ह वाशिमकरांना सहन करावा लागला. एरव्ही पावसाळयाची सुरुवात जुनच्या पहिल्या आठवडयात होते आणि आॅगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या महिन्यात मान्सुन परततो परंतु यंदा जुलेैच्या दुसºया आठवडयात मान्सुनचे आगमन झाले आणि आॅक्टोबर अखेरपर्यंत पाऊस बरसला होता. त्यानंतरही अधून-मधून पाऊस आल्याचे दिसून आले. दसरा, कोजागिरी व दिवाळीमध्ये थंडी असायला पाहिजे होती परंतु तसे झालेले दिसून आले नाही. दिवाळीच्या दिवशी मात्र पाऊस आला होता. सद्यस्थितीत जिल्हयातील वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण आणि थंडीची लाट पसरलेली दिसून येत आहे. गत दोन दिवसाआधी काही भागात तुरळक पाऊसही पडला. (प्रतिनिधी)

हवामान बदलामुळे कृषी क्षेत्र अडचणीतबदलत्या हवामानामुळे सर्वात जास्त नुकसान हे शेतीचे होत आहे. अतिपावसाने खरिपाची, तर उष्णतेमुळे रब्बीची पिके धोक्यात येत आहेत. उष्णता वाढ असल्याने पिकांत मोठया प्रमाणावर बाष्पीभवन होते. पिकाला वेळेवर आणि गरजेपुरते पाणी उपलब्ध न झाल्यास पिीके करपून जातात. पावसाचे दिवस कमी होत असल्याने विविध पिकांच्या उत्पादनासाठी ही गोष्ट हानिकारक आहे. केवळ पेरणीनंतर पाऊस पडून गेला आणि फूल आणि फळधारणेच्या काळात पिकाला आवश्यक तेवढे पाणी न मिळाल्यास उत्पादनात यामुळे घट येत आहे. अति उष्णता, अती थंडी ही पिकांना घातक आहेच, शिवाय धुक्यामुळेदेखिल पिकावर रोगकिडीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षत गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते . उष्णतेमुळे दुग्ध आणि पोल्ट्री व्यवसायही अडचणीत आला होता. हवामान बदलामुळे एकूण कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.ग्रामीण भागात शेकोटया पेटल्यागत दोन दिवसांपासून अचानक पडत असलेल्या थंडीमुळे ग्रामीण भागात शेकोटया पेटण्यास सुरुवात झालेली दिसून येत आहे. शहरी भागातही नागरिकांच्या अंगात गरम कपडे दिसून येत आहेत.अवेळी पाऊस आणि त्यामुळे पडणारे धुके तसेच तीव्र थंडीचा पिकांवर विपरित परिणाम होतोच, तथापि पीके कोणत्या स्थितीत आहे यावर ते अंवलंबून असते. थंडीमुळे अळयांचा प्रादूर्भाव, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होतो.-एस.एम. तोटावारजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी , वाशिम

टॅग्स :washimवाशिमweatherहवामान