शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पारा घसरला; बोचऱ्या थंडीने वाशिमकर हैरान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:51 IST

जिल्हयातील वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण आणि थंडीची लाट पसरलेली दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वातावरणातील अचानक बदल होऊन तापमान १७ अंशावर गेले. गत दोन दिवसांपासून जिल्हयात थंडी वाढू लागल्याने दिवसा रस्त्यावर फिरणाºया नागरिकांच्या अंगात गरम कपडे दिसून येत आहेत. वातावरणात गारवा व ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.यावर्षी उन्हाळा तसेच पावसाळयातही ऋतुचक्रातील बदलाचा परिणाम दिसून आला. जवळपास जुलै अखेरपर्यंत तापमानाचा जोर व उन्ह वाशिमकरांना सहन करावा लागला. एरव्ही पावसाळयाची सुरुवात जुनच्या पहिल्या आठवडयात होते आणि आॅगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या महिन्यात मान्सुन परततो परंतु यंदा जुलेैच्या दुसºया आठवडयात मान्सुनचे आगमन झाले आणि आॅक्टोबर अखेरपर्यंत पाऊस बरसला होता. त्यानंतरही अधून-मधून पाऊस आल्याचे दिसून आले. दसरा, कोजागिरी व दिवाळीमध्ये थंडी असायला पाहिजे होती परंतु तसे झालेले दिसून आले नाही. दिवाळीच्या दिवशी मात्र पाऊस आला होता. सद्यस्थितीत जिल्हयातील वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण आणि थंडीची लाट पसरलेली दिसून येत आहे. गत दोन दिवसाआधी काही भागात तुरळक पाऊसही पडला. (प्रतिनिधी)

हवामान बदलामुळे कृषी क्षेत्र अडचणीतबदलत्या हवामानामुळे सर्वात जास्त नुकसान हे शेतीचे होत आहे. अतिपावसाने खरिपाची, तर उष्णतेमुळे रब्बीची पिके धोक्यात येत आहेत. उष्णता वाढ असल्याने पिकांत मोठया प्रमाणावर बाष्पीभवन होते. पिकाला वेळेवर आणि गरजेपुरते पाणी उपलब्ध न झाल्यास पिीके करपून जातात. पावसाचे दिवस कमी होत असल्याने विविध पिकांच्या उत्पादनासाठी ही गोष्ट हानिकारक आहे. केवळ पेरणीनंतर पाऊस पडून गेला आणि फूल आणि फळधारणेच्या काळात पिकाला आवश्यक तेवढे पाणी न मिळाल्यास उत्पादनात यामुळे घट येत आहे. अति उष्णता, अती थंडी ही पिकांना घातक आहेच, शिवाय धुक्यामुळेदेखिल पिकावर रोगकिडीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षत गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते . उष्णतेमुळे दुग्ध आणि पोल्ट्री व्यवसायही अडचणीत आला होता. हवामान बदलामुळे एकूण कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.ग्रामीण भागात शेकोटया पेटल्यागत दोन दिवसांपासून अचानक पडत असलेल्या थंडीमुळे ग्रामीण भागात शेकोटया पेटण्यास सुरुवात झालेली दिसून येत आहे. शहरी भागातही नागरिकांच्या अंगात गरम कपडे दिसून येत आहेत.अवेळी पाऊस आणि त्यामुळे पडणारे धुके तसेच तीव्र थंडीचा पिकांवर विपरित परिणाम होतोच, तथापि पीके कोणत्या स्थितीत आहे यावर ते अंवलंबून असते. थंडीमुळे अळयांचा प्रादूर्भाव, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होतो.-एस.एम. तोटावारजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी , वाशिम

टॅग्स :washimवाशिमweatherहवामान