शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:51 IST

वाशिम : नीट परीक्षा न देता मेडिकलला प्रवेश देण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. या निर्णयाबाबत जिल्ह्यातील विद्यार्थी, तज्ज्ञांची ...

वाशिम : नीट परीक्षा न देता मेडिकलला प्रवेश देण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. या निर्णयाबाबत जिल्ह्यातील विद्यार्थी, तज्ज्ञांची मते जाणून घेतली असता चाळणी परीक्षा आवश्यक असल्याचे काहींनी सांगितले, तर बारावीतील गुणवत्तेनुसार प्रवेश असावेत, असे मत काहींनी व्यक्त केले.

बारावीनंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावयाचा यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. वैद्यकीय प्रवेशासाठी राज्यात १२ सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेतील गुणानुक्रमानुसार शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळतो. सर्व राज्यात नीट परीक्षा घेण्यात येते. दरम्यान, तामिळनाडू राज्यात नीट परीक्षेच्या १९ तास आधी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने तेथील राज्य सरकारने नीट परीक्षेतून विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक संमत केले. याबाबत जिल्ह्यातील तज्ज्ञ, विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

......

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?

नीट परीक्षेतून राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तामिळनाडू राज्यातील विधानसभेत मांडले गेले आणि संमतही झाले. सरकारी व खासगी संस्थांमध्ये वैद्यकीय पदवीच्या जागांसाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील.

-----------------------धक्कादायक निर्णय

वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा आवश्यक आहे. कोणतेही दडपण न बाळगता विद्यार्थ्यांनी या चाळणी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाणे अपेक्षित आहे.

- आकाश आहाळे, शिक्षणतज्ज्ञ

------------------------वैद्यकीय प्रवेशासाठी नीटसारखी परीक्षा असायला हवी. बारावीतील गुण आणि चाळणी परीक्षेतील गुण ग्राह्य धरून अंतिम निकाल असायला हवा.

- किशोर वाहणे, शिक्षणतज्ज्ञ

------------------------विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

वैद्यकीय प्रवेशासाठी नुकतीच नीट परीक्षा दिली आहे. बारावीतील गुणांना ५० टक्के आणि नीट परीक्षेतील गुणांना ५० टक्के असा मिळून वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश असावा.

- अजित मकासरे, विद्यार्थी

-------------------------नीट परीक्षेची काठिण्य पातळी अतिउच्च असल्याने काही विद्यार्थी या परीक्षेचा धसका घेतात. आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे जायला हवे.

- सचिन गोटे, विद्यार्थी