शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 14:53 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेऊन प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने ‘लोकमत’ने विविधांगी वृत्त प्रकाशित करून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, ‘लोकमत’च्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेऊन प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती दिली आहे. त्यानुषंगाने विहिरींचे अधिग्रहण आणि अतीटंचाईग्रस्त गावांना विनाविलंब टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात उद्भवणारी पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ५९ लाख ९४ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार केलेला आहे. याअंतर्गत जून २०१९ पर्यंत ५०४ गावांसाठी ४८१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ८ गावांमध्ये विंधन विहीर दुरुस्ती, ४ गावांमध्ये तात्पुरती नळ योजना, ३६ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा, तर ४३३ गावांमध्ये विहिर अधीग्रहणाच्या उपाययोजनांचा समावेश आहे.असे असले तरी जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू प्रकल्पांची पाणीपातळी कमालीची खालावल्याने तथा गावागावांमधील जलस्त्रोत कोरडे पडू लागल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होवूनही अधिकांश गावांमध्ये डिसेंबर २०१८ मध्ये तयार झालेल्या पाणीटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासनाने दिरंगाईचे धोरण अवलंबिले होते. ११ एप्रिल रोजी पार पडलेल्या वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या कामात प्रशासकीय यंत्रणा गुंतल्यानेही पाणीटंचाईच्या मुद्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. परिणामी, सर्वच तालुक्यांमधील टंचाईग्रस्त गावांमधील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट व्हायला लागली. ही बाब ‘लोकमत’ने ८ ते १२ एप्रिलदरम्यान प्रकाशित केलेली पाच भागांची वृत्तमालिका आणि १४ एप्रिलच्या अंकात ‘खैरखेड्यात पेटली पाणीटंचाई!’, या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्तामधून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची तडकाफडकी दखल घेत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावरून सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची यादी तत्काळ सादर करण्याचे फर्मान सोडले आहे. तसेच विहिर अधिग्रहण, टँकर, नळयोजना दुरूस्ती यासह अन्य उपाययोजना विनाविलंब राबविण्यात याव्या, अशाही सूचना देण्यात आल्या असून अनेक उपाययोजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस गती देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील गावांमध्ये उद्भवणाºया पाणीटंचाईवर प्रभावीरित्या मात करण्यासाठी ४ कोटी ५९ लाख ९४ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी केली जात आहे. तालुकास्तरावरून तहसीलदारांमार्फत पाणीटंचाई निवारणार्थ विहिर अधिग्रहण, तात्पुरती नळ योजना योजना, टँकरने पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजनांचे प्रस्ताव प्राप्त होताच तत्काळ अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुषंगाने २७ गावांमध्ये ३५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून टँकरही सुरू झाले आहेत.- ह्रषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदwater scarcityपाणी टंचाई